ते आमदार गुवाहाटीला निघालेले, काँग्रेस आमदाराचा आरोप
काँग्रेस आमदार इरफान अन्सारी, राजेश कच्छफ आणि नमन बिक्सल कोंगारी या तीन आमदारांना पश्चिम बंगाल पोलिसांनी अटक केली होती. काँग्रेसचे दुसरे आमदार जयमंगल सिंह यांनी ते आमदार गुवाहाटीला आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सरमा यांना भेटण्यासाठी निघाले होते, असा आरोप केला आहे. जयमंगल सिंह यांनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रातील माहितीनुसार जितके आमदार फुटतील त्यांना मंत्री बनवलं जाईल आणि प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचा दावा सिंह यांनी केला. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकार पाडल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन करण्याचा डाव असल्याचं जयमंगल सिंह यांनी म्हटलं.
आपल्याच बँकेत चोरी, तिजोरीत भरली रद्दी, ६८ कोटी घेऊन महिला जेटने फरार…
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत भाजपवर आरोप केला होता. भाजपचं ऑपरेशन लोटस पश्चिम बंगलामध्ये फसलं. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात जे घडवलं ते त्यांना झारखंडमध्ये करायचं आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला. तर, काँग्रेस झारखंडचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सरकार पाडण्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री स्वत: आमदारांशी संपर्क साधत आहेत. केंद्रातील मंत्री आमदारांना धमकी देत आहेत. महाराष्ट्रात घडलं त्याप्रमाणं झारखंडमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न होत असल्याचं अविनाश पांडे म्हणाले.
संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी, ‘सामना’ची लेखणी आणि शिवसेनेचा ‘आवाज’ जेरबंद!
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह अपक्ष आमदार गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लू मध्ये थांबले होते. आता, त्यानंतर झारखंडमधील काँग्रेसचे तीन आमदार गुवाहाटीला जाताना त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप एका काँग्रेस आमदारानं केलाय. त्यामुळं आसाम हे ऑपरेशन लोटसचं केंद्र बनतंय का, अशा चर्चा सुरु आहेत.
महाविकास आघाडीत धमाका!, शिवसेनेच्या माजी आमदाराने केली मोठी घोषणा