आयपीएलमुळे आता हार्दिक पंड्याचे नशिब चांगलेच बदलल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये हार्दिकने दमदार नेतृत्व तर केलेच पण त्याचबरोबर नेत्रदीपक फलंदाजी आणि गोलंदाजीही केली. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. टीम इंडियामध्ये दाखल झाल्यावर आता हार्दिकचे चांगलेच प्रमोशन झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हार्दिकचे भारतीय संघातील वजन चांगलेच वाढले आहे.