नवी दिल्ली : भारताचा दुसऱ्या वनडे सामन्यात मानहानीकारक पराभव झाला. पण या पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का बसल्याचे आता समोर आले आहे.

भारतीय संघासाठी हा सामना म्हणजे एक मोठी शिकवण असेल. कारण भारताला त्यांच्याच मातीत येऊन ऑस्ट्रेलियाने आपल्या समोर लोटांगण घालायला भाग पाडले. फलंदाजी हे भारताचे बलस्थान समजले जात होते. पण भारताची फलंदाजीही फुसका बार ठरू शकतो, हे आज सर्वांना पाहायला मिळाले. कारण भारताची फलंदाजी हा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि तिथेत भारताने हा सामना गमावला. हा सामना गमावल्यावर भारतीय संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे.

भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली होत होती. पण आता भारताच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. कारण भारतीय संघाच्या नावावर आता एक नकोसा जमा झाला आहे. कारण गेल्या तीन वर्षांत भारताला असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला नव्हता. गेल्या तीन वर्षांत भारताने सामने गमावले नाहीत असे नाही, पण गेल्या तीन वर्षांत भारतीय संघाला १० विकेट्सने पराभव पत्करावा लागला नव्हता. त्यामुळे भारतासाठी हा एक मोठा धक्का आहे. कारण काही महिन्यांनी वनडे विश्वचषक आहे आणि तोदेखील भारतात आहे. त्यामुळे भारतामध्येच खेळत असताना भारतीय संघावर ही एक मोठी नामुष्की ओढवली आहे. भारतीय संघाला पहिल्या वनडे सामन्यातही जास्त धावा करता आल्या नव्हत्या. ऑस्ट्रेलियाने भारतापुढे १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान माफक वाटत होते. पण तरीही भारतची या सामन्यात ३ बाद १६ अशी अवस्था झाली होती. भारताचा अर्धा संघ १०० धावांच्या आतमध्येच बाद झाला होता. त्यामुळे गेल्या दोनही सामन्यांत भारताचे फलंदाज अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. पण दुसऱ्या सामन्यात तर भारताचे पानीपत झाले. त्यामुळे भारताला आता एक मोठा धक्का पराभव आणि त्यानंतर नकोश्या विक्रमाच्या रुपात बसला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *