कोलंबो : भारताने पाकिस्तानवर २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर भारतीय संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या आनंदात अजून वाढ झाली आहे.

भारताने पाकिस्तानवर या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय साकारला. आतापर्यंत भारताला एवढा मोठा विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे या दणदणीत विजयाचा भारताला नक्कीच फायदा होणार आहे. भारताने हा सामना जिंकला आणि त्यानंतर त्यांच्यासाठी अजून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

भारताने सुपर ४ च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला धुळ चारली. भारताने तब्बल २२८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यापूर्वी आशिया कपच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर होता आणि पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानावर होता. पाकिस्तानने यापूर्वी बांगलादेशवर विजय मिळवला होता, त्यामुळे त्यांच्या खात्यात २ गुण होते. पण भारताचा हा पहिलाच सामना होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात गुण नव्हते. पण या विजयानंतर सर्व समीकरण ब़दलले आहे. कारण या विजयानंतर भारतालाही दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांचे समान दोन गुण आहेत. पण भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला आणि त्याचा फायदा त्यांना यावेळी झाला आहे. कारण भारताने मोठा विजय मिळवला आणि त्यामुळेच त्यांचा रन रेट चांगलाच वाढला आहे. या सामन्यानंतर भारताचा रन रेट हा ४.५६० एवढा झाला आहे. गुणतालिकेत हा सर्वात जास्त रन रेट आहे, त्यामुळे भारतीय संघाने या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानचेही यावेळी दोन गुण असले तरी त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा रन रेट – १.८९२ असा झाला आहे. हा सर्वात कमी रन रेट आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. त्यामुळे भारत या विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारताने जो मोठा विजय मिळवला त्याचा फायदा त्यांना यावेळी झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *