नाशिक : बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं म्हटलं. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून गेलेले, आमदार, खासदार पुन्हा निवडून येता कामा नये. त्याच्यासाठी आपल्याला चांगली बांधणी केली पाहिजे. त्यांनी मला अमरावती किंवा शिर्डी यापैकी निवड करण्यासाठी सांगितले होते. मी शिर्डीची निवड केली, असं बबनराव घोलप म्हणाले.

मला संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानं कामाला लागलो होतो. मी संपर्कप्रमुख झाल्यावर चांगली तयारी केली. मला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला पण पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता त्यामुळं त्यात बदल केला, पण त्याला मुंबईतून स्थगिती दिली. यानंतर काम सुरु होतं. ३५ शाखांची स्थापना केली होती. उद्धव ठाकरे यांचा नुकताच दौरा झाला, त्या दौऱ्याची माहिती मला देण्यात आली नव्हती, असं बबनराव घोलप म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा दौरा मला कळवण्यात आला नाही.भाऊसाहेब वाकचौरे गद्दार होते ते शिवसेना सोडून गेले होते. वाकचौरेंनी कोर्टात केलेल्या केसेस सुरु आहेत पण त्याला पक्षात घेतलं. ते वाकचौरे आता प्रचार करत असताना, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. वाकचौरेंना जर उमेदवार करायचे होते, तर मला का सांगितलं? असा सवाल बबनराव घोलप यांनी केला.
भारताला वर्ल्डकपपूर्वी बसला धक्का, श्रेयस अय्यरच्या दुखापतीने शस्त्रक्रियेनंतरही डोकं काढलं वर; रोहितने दिली माहिती
उद्धव ठाकरे यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यात वाकचौरे यांनाच पुढे पुढे करण्यात आले. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे कॅमेऱ्याजवळ जात होते त्यावेळी मिलिंद नार्वेकर वाकचौरेंना पुढं ढकलत होते. त्यानंतर मी घरी गेलो उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार होतो पण दुसऱ्याच दिवशी सामनामध्ये माझं संपर्कपद काढून घेतल्याचे छापून आले. माझ्याशी अशी वागणूक असेल तर शिवसैनिकांचं काय असेल म्हणून मी हातानं राजीनामा लिहिला आणि व्हाटसअपवर राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला, असं बबनराव घोलप म्हणाले.
उद्धव ठाकरेंना विजयाची खात्री असलेल्या लोकसभा मतदारसंघातच धक्का, बड्या नेत्याचं राजीनामास्त्र, कारण…
मी त्यांना कालच राजीनामा पाठवला आहे. खासदार संजय राऊत यांनी मला बोलावलं आहे. मी उद्या त्यांच्या भेटीला जाणार आहे. मी गेली ५५ वर्ष शिवसेनेत काम करतो आहे. १९६८ ला माझ्या शाखेचं उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आहे. मी ५५ वर्षे झाले, शिवसेनेत काम करत आहे, त्यांनी मला काढून टाकावं, मी बाहेर जाणार नाही, असं बबनराव घोलप यांनी सांगितलं.

शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही, होर्डिंग्ज का लावले, उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

बबनराव घोलप परतले आणि शिर्डीतलं वातावरण बदललं, लोखंडेंचं टेन्शन ठाकरेंनी वाढवलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *