मुंबई : भारतातील वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या सामन्याला आता प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबाबतची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी का दिली जाणार नाही, याचे कारणही आता बीसीसीआयने सांगितले आहे.

पाकिस्तानचा संघ सुरुवातीला वर्ल्ड कपसाठी भारतामध्ये येण्यासाठी तयार नव्हता. पण कालांतराने त्यांचा हा विरोध मावळला आणि त्यांनी भारतामध्य वर्ल्ड कप खेळायला येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अहमदाबाद येथील सामन्याची तारीखही बदलण्यात आली. त्यामुळे पाकिसातानची या वर्ल्ड कपपूर्वीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता तर पाकिस्तानच्या संघाच्या सामन्याला प्रेक्षकांना परवानगी देणार नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ” पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये २९ सप्टेंबरला वर्ल्ड कपचा सराव सामना हैदराबादला खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानात परवानगी देण्यात येणार नाही. कारण हा सामना हैदराबाद येथे २९ सप्टेंबरला होणार आहे. त्यापूर्वी म्हणजेच २८ सप्टेंबरला हैदराबादमध्ये गणेश विसर्जन आणि मिलन उन नबी हे दोन्ही कार्यक्रम असणार आहे. मिलन उन नबीमध्ये जुलूस हा रात्री उशिरापर्यंत चालतो. त्याचबरोबर गणेश विसर्जनही रात्री जास्त वेळ चालू शकते. त्यामुळे या दोन्ही सार्वजनिक कार्यक्रमात स्थानिक पोलिस व्यस्त असतील. त्यामुळे त्यांना लगेच दुसऱ्याच दिवशी या सामन्याला सुरक्षा पुरवता येणार नाही. त्यामुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश न देण्याचा निर्णय हैदराबाद क्रिकेट संघटनेने घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या या सामन्याला मैदानात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. पण दोन्ही संघांना मैदानात येण्यासाठी मात्र सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.”

हैदराबादच्या चाहत्यांसाठी हा निर्णय जिव्हारी लागणारा असेल. कारण हा सामना सोडला तर हैदराबादमध्ये फक्त तीनच सामने होणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये भारताचा एकही सामना नाही.

फायनल जिंकून टीम इंडिया हॉटेलमध्ये परतल्यावर क्रिकेटप्रेमींचा जल्लोष

आता पाकिस्तानच्या सामन्यालाही प्रेक्षकांना मैदानात जाता येणार नाही. त्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांसाठी ही एक वाईट बातमी असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *