नवी दिल्ली : वर्ल्ड कपनंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातीस टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ तर निवडला गेला आहे, पण य संघाला मार्गदर्शन कोण करणार हे मात्र अजून बऱ्याच चाहत्यांना समजलेले नाही. या मालिकेसाठी भारताचे प्रशिक्षकपद कोणाकडे असेल, याची माहिती आता समोर आली आहे.

वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविड हे भारताचे प्रशिक्षक होते. पण वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय संघाबरोबर असलेला करार आता संपलेला आहे. यापुढे आता द्रविड यांना पुन्हा भारतीय संघाचे प्रशिक्षकपद द्यायचे का, हा निर्णय अजून बीसीसीआयने घेतलेला नाही. त्यामुळे द्रविड आता यापुढे भारतीय संघाचे कोच असणार की नाही, याबाबत प्रशचिन्ह आहे. पण आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला तर २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पण या संघाचे कोण आहेत तरी कोण, हे आता समोर आले आहे.

बीसीसीआयने सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला. यावेळी भारतीय संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाड हा संघाचा उप कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर या संघात यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमारसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण या खेळाडूंनी मार्गदर्शन कोण करणार, हे आता समोर आले आहे. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत भरातीय संघ खेळला होता तेव्हा टीम इंडियाचे कर्णधारपद ऋतुराजकडे होते, तर प्रशिक्षकपद हे व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे या मालिकेसाठी पुन्हा एकगा लक्ष्मण यांना भारताच्या प्रशिक्षकदासाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. पण ते भारताचे हंगामी प्रशिक्षक असतील. कारण या मालिकेनंतर बीसीसीआय भारताच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे. प्रशिक्षकपदी यावेळी पुन्ही द्रविड येणार की कोणती नवी व्यक्ती हे काही दिवसांतच सर्वांना समजणार आहे. तोपर्यत लक्ष्मण हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील.

काँग्रेस नेते एकत्र बसून घेतायेत IND vs AUS फायनल सामन्याचा आनंद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *