मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मधील पहिली सेमीफायनल मॅच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. स्पर्धेत आतापर्यंत एकही मॅच न गमावणाऱ्या टीम इंडियाची कामगिरी मजबूत असली तरी सेमीफायनलची लढत आणि ती ही न्यूझीलंडविरुद्ध यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

साखळी फेरीत भारताने धरमशाला येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेटनी पराभव केला असला तरी टीम इंडियाच्या चाहत्यांच्या मनातून २०१९च्या सेमीफायनलमधील पराभव गेला नाही. वानखेडेवर होणाऱ्या लढतीत सर्वात महत्त्वाचा एक्स फॅक्टर ठरणार तो टॉस होय. या स्टेडियमवर टॉस गमवणाऱ्या संघाला एक वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. आतापर्यंत या मैदानावर झालेल्या लढतीतून ही गोष्ट समोर आली असून याला अपवाद भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मॅच देखील नसेल.

BCCI सचिव जय शहा यांनी श्रीलंका क्रिकेटची वाट लावली; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराच्या आरोपात अमित शहांचा उल्लेख
टॉस किती महत्त्वाचा

वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ३५७ इतका आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी १८८ इतकी आहे. या आकडेवारीत धावांचा पाठलाग करताना ग्लेन मॅक्सवेलने ठोकलेल्या द्विशतकाचा देखील समावेश आहे. यामुळे वानखेडेवर जो संघ टॉस जिंकले तोच बॉस होण्याची शक्यता अधिक आहे.

विरेंद्र सेहवागसह तिघांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश; प्रथमच एका भारतीय महिलेचा केला गौरव
पॉवर प्ले

टॉस आणि सरासरी धावसंख्या याकडे दुर्लक्ष केले तरी पॉवर प्लेची आकडेवारी समजून घेऊयात. हा फॅक्टर देखील टॉस जे महत्त्व पटवून देतो. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची पॉवर प्लेमधील सरासरी १ विकेटवर ५२ धावा अशी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी ४ विकेटवर ४२ अशी आहे. यामुळेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदाच होतो.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी राहुल द्रविड यांनी रणशिंग फुंकले; एका वाक्यात विषय संपवला
दोन्ही डावातील पॉवर प्ले

वर्ल्डकप २०२३ मध्ये सुरुवातीच्या १० षटकातील म्हणजे पॉवर प्लेमधील दोन्ही डावातील धावसंख्येत बरच अंतर पहायला मिळाले आहे. पहिल्या डावातील पॉवर प्लेमध्ये वानखेडेवर ५ बाद २०९ धावा केल्या आहेत आणि सरासरी ४१.८० इतकी राहिली आहे. दुसऱ्या डावातील पहिल्या १० षटकात १६८ धावा झाल्या असून त्यात १७ विकेट गमावल्या आहेत आणि सरासरी ९.८८ इतकी आहे. वानखेडेवर टॉस किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येण्यासाठी हे ३ फॅक्टर महत्त्वाचे आहेत. एकूणच पहिल्या सेमीफायनलमध्ये टॉस जिंका आणि फायनलचे तिकीट मिळवा असे काहीचे चित्र दिसते.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *