नागपूर: रत्नागिरीतील रिफायनरी समुद्र किनाऱ्यावरील आहे. यास विरोध झाल्यास केरळ वा चेन्नईला जाण्याचा धोका उद्भवू शकतो, अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. उपराजधानीत रिफायनरीच्या मागणीकडे लक्ष वेधले असता ‘राज्यात समुद्रकिनाऱ्यावरील रिफायनरी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला होणारा विरोध परवडणार नाही. अन्यथा तो केरळ वा अन्य ठिकाणी जाऊ शकतो. नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा एक अहवाल आला. दुसरा लवकरच अपेक्षित आहे. या भागात कॉम्प्लेक्ससाठी अनुकूल स्थिती आहे. याचा सर्व पातळीवर पाठपुरावा केला जाईल’, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
तत्वज्ञान सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात; मोहन भागवत यांचे प्रतिपादन
समृद्धी महामार्गावरील गॅस लाइन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता लहानमोठ्या उद्योगांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, ‘अमरावतीत एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क आला. दुसराही येत आहे. यवतमाळमध्ये उद्योग येत आहेत. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी विभागांची मुख्यालये आहेत. अशा शहरांचा विकास न झाल्यास त्याचे परिणाम इतर भागांवर होतात. समतोल विकास हीच आमची भूमिका आहे.’

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर एक-दोन महिन्यात निकाल लागू शकतो. गोसेखुर्द प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मूळ योजना पुढच्यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपमधील इन्कमिंग तात्पुरते थांबवले असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पक्षात येण्यासाठी काँग्रेसचे आमदार, नेतेही इच्छुक आहेत. याबाबत कुठलाही घाई नाही. निवडणुकीच्या वेळी त्यांना प्रवेश देऊ, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपसाठी कुंपणावर असलेल्यांकडे संशयाची सुई वळली आहे.

राजकोट किल्ला परिसरात शिवरायांचा पुतळा आणि तटबंदीचे काम अवघ्या पन्नास दिवसात पूर्ण होणार

संत्री उत्पादकांना फळे निर्यात करता यावीत, यासाठी इतर देशांनी लावलेल्या आयात शुल्कावर आम्हाला काही करता येत नाही. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा झाली. शेतकऱ्यांना लागणाऱ्या शुल्कासाठी निम्मे अनुदान देता येईल का, हे विचारधीन आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणास जाण्याची सर्वांची इच्छा आहे. मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होतो. २२ जानेवारी रोजी मुख्य सोहळा असला तरी आम्हाला कोणत्या तारखेचे निमंत्रण मिळते, त्यानुसार नियोजन केले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *