दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना; भरधाव मर्सिडीजने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना पुण्यातील नवले ब्रिज जवळ एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. कारमधील मद्यधुंद चालकासह चार लोकांची अद्यापही मेडिकल झालेली नाही. आरोपींना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप अपघातात मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. पुण्यात पुन्हा भररस्त्यात कोयता हल्ल्याचा थरार पुण्यामध्ये कोयत्या गॅंगची दहशत कमी होताना दिसून येत नाहीये. 17 एप्रिलला कोयत्या गँगने एका जणावर हल्ला चढवला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. या गँगवर कारवाई करावी अशी मागणी मी अधिवेशनात केली होती पण अशी गँग नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आता याकडे गृहमंत्री-पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सविस्तर वाचा बोनी-अनिल कपूर यांच्या आईवर आज अंत्यसंस्कार बोनी कपूर आणि अनिल कपूर यांच्या आई निर्मल कपूर यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी, २ मे रोजी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ११:३० वाजता विले पार्ले स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार केले जातील. निर्मल कपूर गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविस्तर वाचा अश्लील कटेंटसाठी एजाज खानविरुद्ध गुन्हा दाखल बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसलेला अभिनेता एजाज खान सध्या त्याच्या नवीन शो ‘हाऊस अरेस्ट’मुळे चर्चेत आहे. तो आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शोमध्ये अश्लील कंटेंट दाखवल्याच्या आरोपाखाली एजाज खान आणि शोशी संबंधित इतर लोकांविरुद्ध मुंबईच्या अंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावात शरद पवारांना पुन्हा झटका जळगावात जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यातच माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांचा देखील मुंबईमध्ये अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा खानदेश मधील मोठा झटका मानला जात आहे. सविस्तर वाचा शहांचा राजीनामा न मागणाऱ्या विरोधी पक्षांची कीव येते- राऊत पहलगाम अतिरेकी हल्ल्यावरून विरोधी पक्षांनी सर्वात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा. नंतर समर्थनाच्या गोष्टी कराव्यात, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. एवढा मोठा हल्ला झाला. भारताचे 27 नागरिक मारले गेले, तरी त्यांच दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर दिसत नसल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. मोदी टंगळमंगळ करत भारतभर फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सविस्तर वाचा मुख्यमंत्री साहेब या लेकींचा काय दोष?- राजू शेट्टी परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना गावातील शेतकऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्म-हत्येवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक प्रश्न विचारला आहे. या संबंधी राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी कळकळीची विनंती केली आहे. सविस्तर वाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे शरद पवारांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातल्या सर्व माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सर्वात अग्रस्थानी शरद पवार यांचे नाव आहे. अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे पक्ष झाल्यानंतर हे दोन्ही नेते अनेक कार्यक्रमात एकत्र आलेले दिसून आले आहेत. मात्र आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असून त्याला शरद पवार हजेरी लावणार का? अशी चर्चा रंगली आहे. सविस्तर वाचा औंढा नागनाथमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ औंढा नागनाथ येथील मुख्य बाजारपेठेतील तब्बल 11 दुकाने चोरट्यांनी एका रात्रीच फोडल्याची घटना शनिवारी ता. 3 सकाळी उघडकीस आली आहे. यामध्ये काही मोबाईल शॉपी, तीन आपले सरकार सेवा केंद्र तर इतर दुकानांचा समावेश आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सविस्तर वाचा अकोला 44.9° तापमानाने देशातील सर्वात उष्ण शहर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह १९ राज्यांमध्ये वादळाचा इशारा आहे. राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येऊ शकते. त्याच वेळी, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. शुक्रवारी दिल्लीत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामान खात्याने शनिवारीही वादळाचा इशारा जारी केला आहे. बदललेल्या हवामानादरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील १२ शहरांमध्ये ४३° ते ४४° दरम्यान तापमान नोंदवले गेले. महाराष्ट्रातील अकोला हे ४४.९° तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर होते. सविस्तर वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment