वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज
घाबरलेल्या हरणाच्या पिल्लाची सर्व प्रथम तपासणी करून हरणाच्या निवासस्थानी त्या पिल्लाला सुरक्षित सोडण्यात आले. सध्या जंगलातील काही ठिकाणचे पाणवठे आटले आहेत. त्यामुळं पाण्याच्या शोधत वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. असाच एक हरणाचा कळप या परिसरात आला होता. या कळपातील हरणाचे एक पिल्लू चुकून पोहेकर यांच्या विहिरीत पडले.
वाचाः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, पण विदर्भात अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
सध्या कडाक्याची थंडी असल्याने विहिरीत पडलेले हे पिल्लू गारठून गेलं होतं. या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली आणि तात्काळ वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गारठलेल्या हरणाला विहिरीच्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले. या प्रसंगी वनरक्षक के जी जाधव व्ही एस मुसळे यांनी मोलाची सहकार्य केले. यावेळी शेत शिवारातील शेतकरी उपस्थित होते. हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळाल्याने वन विभागाचे कौतुक करण्यात आले.
वाचाः महिलेने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचं सांगितलं, नंतर घडलं असं काही की पत्नीला झाली अटक