पिंपरी : पिंपरी चिंचवड येथे एका कुटुंबातील चिमुकल्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. मात्र त्याच्या कुटुंबाने आपल्या मुलाच्या शरीराचे तब्बल सात अवयव दान करून सात जणांना जीवदान दिले आहे. आज दुर्दैवाने चिमुकला त्यांच्यासोबत नसला, तरी शरीरातील अवयवांच्या माध्यमातून तो जगात असल्याच्या भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या अक्षत लोहाडे याचा स्पोर्ट्स बाईक चालवत असताना अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. त्यामुळे लोहाडे कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

सकाळी बहिणीसोबत खेळणारा मुलगा संध्याकाळी आपल्यात नसल्याचं दुःख त्यांच्या मनात होते. त्यातून सावरत कुटुंबाने एक आदर्श निर्णय घेऊन त्याला जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या शरीरातील तब्बल सात अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

नाग डसल्याने लेक गेली, कुटुंबाचा धीरोदात्तपणा, पंचक्रिया विधीला फाटा, सर्पदंश जागृती अभियान
अपघातात अवघ्या तीन सेकंदात एका अल्पवयीन मुलाने आपला जीव गमावला तर त्याच्यासोबत असलेल्या अक्षतच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो ब्रेन डेड झाला. त्याच्यावरील सर्व उपचार अयशस्वी ठरल्याने अक्षतचे डोळे, फुफ्फुस, यकृत, किडनी, मूत्रपिंड आणि हृदय हे सात अवयव कुटुंबाने दान करून इतर गरजूंना जीवनदान दिले. त्यांच्या शरीरात त्यांनी अक्षतला जिवंत ठेवण्याचे काम केले.

लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान
अपघात होण्याच्या काही मिनिट अगोदर अक्षत हा आपल्या बहिणीच्या अंगावर बसून मस्ती करत होता. त्याच्या तो शेवटचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. खेळायला जातो म्हणून अक्षत न सांगताच मित्रासोबत स्पोर्ट्स बाईकवर राईड मारायला गेला होता. मात्र वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने झालेल्या अपघातात तो मृत पावला.

Rakshabandhan : भावाच्या निधनानंतरही त्याच हातांना राखी बांधते बहीण, अवयवदान झालेल्या तरुणाशी अनोखे बंध
आता अक्षतच्या अशा असंख्य आठवणी जपण्यापलीकडे कुटुंबियांच्या हातात काहीच उरलं नसलं, तरी त्यांच्या एका धाडसी निर्णयामुळे सात जणांना नवीन जीवन मिळाले आहे. ज्यांना हे अवयव दान केलेले आहेत. त्यांच्यात अक्षत जिवंत असल्याचं समाधान जरी त्यांना असलं तरी तो आपल्यात नसल्याची सल मात्र आयुष्यभर त्यांच्या मनात घर करून राहणारी आहे.

Amravati : ब्रेनडेड रुग्णाने उजळले पाच जणांचे आयुष्य

आपली मुले बाहेर गेल्यानंतर काय करतात, याबाबत पालकांनी सजग राहणे या काळात अत्यंत गरजेचे आहे. मात्र ही घटना घडली नसती तर आज अक्षत कुटुंबांसोबत असता. केवळ पालकांच्या थोड्याशा दुर्लक्षाने आम्ही आमची मुलं गमावली. त्यामुळे मुलांना महागड्या बाईक घेऊन देण्याची खरंच गरज आहे का? याचा विचार पालकांनी करायला हवा तर शासनाने देखील वाहन परवाना देण्यासाठीचे नियम अधिक कठोर करावेत अशा भावना अक्षतच्या आईने व्यक्त केल्या आहेत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *