दिव्यांग मंत्रालय झाले असले तरी मंत्री आणि सचिव नाही:मानधन सर्वात कमी आणि वेळेवर मिळत नाही, बच्चू कडू यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

दिव्यांग मंत्रालय झाले असले तरी मंत्री आणि सचिव नाही:मानधन सर्वात कमी आणि वेळेवर मिळत नाही, बच्चू कडू यांनी दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा दिल्यानंतर असलेली सुरक्षा सुद्धा काढूहण टाकावी, कुठली सुरक्षा ठेवण्यात येऊ नये, असे सुद्धा बच्चू कडू यांनी पत्रात म्हंटले आहे. तसेच दिव्यांगांशी बेईमानी कदापि शक्य नसल्याचे कडू यांनी म्हंटले आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी कदापि शक्य नाही म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे. मंत्रालय निर्मितीनंतर आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळाल्या नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडू त्यांच्या पत्रात म्हणाले, इतर राज्यांपेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्रामध्ये मिळणारे मानधन सर्वात कमी आहे. मिळणारे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाच टक्के निधी खर्च केला जात नसल्याचे देखील कडू यांनी त्यांच्या पत्रात म्हंटले आहे. बच्चू कडू म्हणतात, अजूनही स्वतंत्र मंत्री आणि सचिव पद या मंत्रालायसाठी नेमण्यात आलेला नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय सुद्धा नाही. पदभरती सुद्धा करण्यात आलेली नाही. इंटर अनेक गोष्टी झाल्या नसल्याचे बच्चू कडू यांनी पत्रात म्हंटले आहे. तसेच या पदावर राहून ते होणार अशी शक्यता मावळली आहे. म्हणूनच दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मला आंदोलन करावी लागणार असल्याने पदावर राहून आंदोलन करू शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment