नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप २०२३ मध्ये सलग ९ विजयांसह इतिहास घडवला आहे. आता सेमीफायनलमध्ये भारताची लढत न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ही लढत रोहित शर्माच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर १५ नोव्हेंबर रोजी होईल. टीम इंडियाने बेंगळुरू येथे झालेल्या अखेरच्या साखळी लढतीत नेदरलँड्सवर विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी सेमीफायनलसाठी रणशिंग फुकले.

कोच द्रविड यांनी एका वाक्यात न्यूझीलंडला धोक्याचा इशारा दिलाय. भारतीय संघाला वर्ल्डकप सेमीफायनलमधील दबाव कसा हाताळायचा याची पूरेपूर जाणीव आहे.

BCCI सचिव जय शहा यांनी श्रीलंका क्रिकेटची वाट लावली; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराच्या आरोपात अमित शहांचा उल्लेख
वर्ल्डकप २०२३ मध्ये भारतीय संघ सर्वात यशस्वी संघ आहे. स्पर्धेत भारत हा एकमेव संघ आहे ज्याचा एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. साखळी फेरीनंतर आता भारतीय चाहते सेमीफायनलच्या लढतीसाठी उत्सक आहेत. ही सेमीफायनल भारतासाठी सर्वात कठीण असेल याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे २०१९च्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलमधील भारताचा झालेला पराभव होय.

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलआधी भारतीय संघाला दुखापतीची भीती; अखेरच्या साखळी लढतीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना

वनडे वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडसमोर आला आहे. या लढतीत भारतासमोर थोडा दबाव असेल करण ही नॉकआउट मॅच आहे. मात्र या लढतीबाबत कोच राहुल द्रविड दबावात नाहीत. स्पर्धेतील या लढतीतील दबाव कसा हाताळायचा हे संघाला माहिती असून ते संघाच्या विजयाबद्दल निश्चिंत आहेत.

विरेंद्र सेहवागसह तिघांचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश; प्रथमच एका भारतीय महिलेचा केला गौरव
द्रविड म्हणाले, आम्हाला कल्पना आहे की ही एक महत्त्वाची आणि नॉकआउट मॅच आहे. या लढतीत काही प्रमाणात दबाव असेल हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र ज्यापद्धतीने आम्ही आतापर्यंत या दबाव हाताळला आहे आणि त्याला उत्तर दिले आहे ते पाहता आमचा आत्मविश्वास वाढेल. संघाच्या दृष्टीकोनात आणि तयारीत कोणताही बदल नाही.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *