मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिली सेमी फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर डावाची सुरुवात नेहमीप्रमाणे रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी यांच्यावर होती. मात्र, रोहित शर्माच्या वादळी खेळीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. रोहित शर्मानं २९ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. रोहित शर्माच्या आक्रमक खेळीचा शेवट टीम साऊथीनं केला. रोहित शर्मा टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या खेळीमुळं टीम साऊथीच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.

टीम साऊथीच्या नावावर नकोसं शतक

टीम साऊथी न्यूझीलंडच्या प्रमुख बोलर पैकी एक समजला जातो. आजच्या सामन्यात मात्र त्याची जादू पाहायला मिळाली नाही. टीम साऊथीनं १० ओव्हर्समध्ये १० च्या इकोनॉमीनं १०० धावा दिल्या. साऊथीच्या नावावर अशा प्रकारे नकोस शतक नोंदवलं गेलं. साऊथीनं रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केलं. अन्यथा टीम इंडियानं ४०० धावांचा टप्पा पार केला असता. साऊथीसह इतर गोलंदाज देखील महागडे ठरले. ट्रेंट बोल्टनं १० ओव्हर्समध्ये ८६ धावा दिल्या त्यानं एक विकेट घेतली.

रोहितनं पाया रचला विराट- श्रेयसनं कळस चढवला

रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांपासून डावाची सुरुवात करताना आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतो. आक्रमक फलंदाजीद्वारे सुरुवातीलाच तो प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलताना दिसून येतो. आज देखील डावाच्या सुरुवातीला रोहित शर्मानं २९ बॉलमध्ये ४७ धावा केल्या यामध्ये चार षटकारांचा समावेश होता. यानंतर शुभमन गिल यानं ८० धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. विराटनं एकदिवसीय कारकीर्दितील ५० वं शतक पूर्ण केलं. यानंतर के.एल. राहुल यानं देखील फटकेबाजी करत संघाला ३९७ धावांपर्यंत पोहोचवलं.Read Latest And



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *