अहमदाबाद : भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. त्यामुळे करोडो चाहते निराश झाले. पण तरीही रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहितचा हा व्हिडिओ पाहून चाहते भावूक झाले आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार कामगिरी केली होती. कारण भारताने वर्ल्ड कपमध्ये सलग १० सामने जिंकले होते. रोहितने या वर्ल्ड कपमध्ये भारातचे दमदार नेतृत्व केले. त्यामुळे भारताला वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत तरी पोहोचता आले. कारण रोहितने भारताचा संघ चांगला बांधला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याने संघाची चांगली बांधणी केली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे रोहितने मैदानात कुशल नेतृत्व केले. पण अंतिम फेरीत मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे रोहित निराश झाला होता. आम्ही २४० धावा केल्या, पण अजून २०-३० धावा असल्या असत्या तर निकाल वेगळा लागू शकला असता, असे रोहितने सामना संपल्यावर सांगितले. ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढल्या आणि ऑस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा पराभव झाला आणि त्यांचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न भंगले. त्यानंतर रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा होत्या, कारण भारताचा कर्णधार त्यावेळी कसा वागतो आणि काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण रोहित यावेळी आपल्या भावना लपवू शकला नाही. वर्ल्ड कप जिंकल्यावर तो फक्त निराशच झाला नव्हता, तर तो आपले अश्रू यावेळी रोखू शकला नाही. कारण पराभवानंतर रोहितच्या डोळ्यात पाणी तरळले होते आणि आपल्या भावना तो रोखू शकला नाही. रोहितचे अश्रू पाहून भारतीय चाहतेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने या वर्ल्ड कपसाठी कसून मेहनत केली होती.वर्ल्ड कपमधले सर्व साखळी सामनेही जिंकले. सेमी फायनल जिंकली. भारत अपराजित होता. पण तरीही फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, याचे दु:ख तो लपवू शकला नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दमदार कामगिरी केली होती. कारण भारताने वर्ल्ड कपमध्ये सलग १० सामने जिंकले होते. रोहितने या वर्ल्ड कपमध्ये भारातचे दमदार नेतृत्व केले. त्यामुळे भारताला वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत तरी पोहोचता आले. कारण रोहितने भारताचा संघ चांगला बांधला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्याने संघाची चांगली बांधणी केली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे रोहितने मैदानात कुशल नेतृत्व केले. पण अंतिम फेरीत मात्र भारताला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे रोहित निराश झाला होता. आम्ही २४० धावा केल्या, पण अजून २०-३० धावा असल्या असत्या तर निकाल वेगळा लागू शकला असता, असे रोहितने सामना संपल्यावर सांगितले. ग्लेन मॅक्सवेलने दोन धावा काढल्या आणि ऑस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा पराभव झाला आणि त्यांचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न भंगले. त्यानंतर रोहित शर्मावर सर्वांच्या नजरा होत्या, कारण भारताचा कर्णधार त्यावेळी कसा वागतो आणि काय करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण रोहित यावेळी आपल्या भावना लपवू शकला नाही. वर्ल्ड कप जिंकल्यावर तो फक्त निराशच झाला नव्हता, तर तो आपले अश्रू यावेळी रोखू शकला नाही. कारण पराभवानंतर रोहितच्या डोळ्यात पाणी तरळले होते आणि आपल्या भावना तो रोखू शकला नाही. रोहितचे अश्रू पाहून भारतीय चाहतेही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने या वर्ल्ड कपसाठी कसून मेहनत केली होती.वर्ल्ड कपमधले सर्व साखळी सामनेही जिंकले. सेमी फायनल जिंकली. भारत अपराजित होता. पण तरीही फायनलमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, याचे दु:ख तो लपवू शकला नाही.
रोहित शर्मा फायनलचा सामान संपल्यावर रडला आणि एका सच्च्या कर्णधाराच्या काय भावना होत्या, हे सर्वासमोर आले.