नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघ आता वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना कधी होणार, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पण आता चाहत्यांना जास्त वेळ या सामन्याची वाट पाहावी लागणार नाही. कारण आता पुढच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना रंगणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात या वर्ल्ड कपमध्ये अहमदाबाद येथे सामना झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलचा सामान होईल, असे म्हटले जात होते. पण पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपच्या बाहेर पडला. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडशी दोन हात करावे लागणार आहे. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना पुन्हा कधी पाहायला मिळणार, याचा विचार चाहते करत होते. पण या चाहत्यांसाठी आता गुड न्यूज आली आहे. कारण आता पुढच्याच महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे. १० डिसेंबर या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई येथे होणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता १० डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार चाहत्यांना अनुभवता येऊ शकतो. कारण आता ८ डिसेंबरपासून १९ वर्षांखालील संघांची आशिया चषक स्पर्धा दुबईत खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा ८ डिसेंबरपासून सुरु होणार आहे आणि १७ डिसेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता १० डिसेंबरची वाट भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे चाहते नक्कीच करत असतील, यात शंकाच नाही. या स्पर्धेतील सर्व सामने सकाळी ९.३० वाजता सुरु होणार आहेत.

१९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे सामने कधी होणार, जाणून घ्या वेळापत्रक…

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

८ डिसेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
१० डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
१२ डिसेंबर – भारत विरुद्ध नेपाळ
१५ डिसेंबर – दोन्ही उपांत्य फेरीचे सामने
१७ डिसेंबर – अंतिम सामना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *