कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ हा सामना रविवारी होणार नाही. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. पण राखीव दिवशी हा सामना किती षटकांचा होणार, याची माहिती आता समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तानचा पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला तेव्हा राहुल १७ आणि विराट कोहली हा ८ धावावंर खेळत होता. त्यावेळी भारताची २ बाद १४७ अशी स्थिती होती. पावसामुळे पाकिस्तानचा संघ जर फलंदाजीला आला तर त्यांना भारतासारखीच २४ षटके खेळायला दिली जातील. या २४ षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २०६ धावांचे आव्हान देण्यात येईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि हा सामना ३४ षटकांचा होईल, असे सांगितले होते. त्याचबरोबर हा सामना रविवारी रात्री ९.०० वाजता सुरु होईल, असेही स्पष्टपणे म्हटले गेले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा पंचांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यानंतर हा सामना राखीव दिवशी खेळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हा सामना आता राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी ११ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना आता २४ किंवा ३६ षटकांचा होणार नाही, तर हा सामना आता पूर्ण ५० षटकांचा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी पूर्ण ५० षटकांचा होणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांना सोमवारी पुन्हा एकदा या सामन्याची लज्जत घेता येणार आहे. पण राखीव दिवशी जेव्हा खेळ सुरु होईल, तेव्हा मैदानाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले जाईल आणि त्यानंतरच हा सामना सुरु केला जाईल. त्यामुळे आता सोमवारी कसे वातावरण असते हे पाहणे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारत आणि पाकिस्तानचा हा सामना आता राखीव दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबरला होणार आहे आणि हा सामना पूर्ण ५० षटकांचा होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *