नवी दिल्ली : भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात पानीपत झाले. त्यानंतर भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे, असे म्हटले जात होते. पण आता भारताच्या या पराभवाचा मोठा पुरावा आता समोर आला आहे.

भारतीय संघासाठी हा काळा दिवस ठरेल. कारण भारताचा हा पराभव लाजीरवाणा होता. कारण या सामन्यात भारताला कोणतीही चमक दाखवता आली नाही. फलंदाजांनी पुरती हाराकिरी केली. त्यामुळे भारताला फक्त ११७ धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. भारत हा सामना जिंकणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण भारताने ऑस्ट्रेलियाच्या किमान २-३ तरी विकेट्स काढाव्यात हे सर्वांच्याच मनात होते. पण ही गोष्ट भारताला जमली नाही. कारण ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच तुफानी फटकेबाजी करत हा सामना संपवला. भारताचा यावेळी १० विकेट्सने पराभव झाला आणि त्यांना या सामन्यात लोटांगण घालावे लागले. कारण हा भारताचा सर्वात मोठा पराभव असल्याचे आता समोर आले आहे.

भारताचा यापूर्वी सर्वात मोठा पराभव हा २०१९ साली झाला होता. हा सामना न्यूझीलंडबरोबर होता आणि तो हॅमिल्टन येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडने तब्बल २१२ चेंडू राखून पराभूत केले होते. म्हणजेच न्यूझीलंडने ३५ षटके आणि दोन चेंडू राखून भारतावर मोठा विजय साकारला होता. पण भारताचा यापेक्षा मोठा पराभव यावेळी पाहायला मिळाला. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल २३४ चेंडू राखून भारताला पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ११ षटकांत पूर्ण केले. म्हणजेच ऑस्ट्रेलियाने तब्बल ३९ षटके राखून हा विजय मिळवला. त्यामुळे आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना वनडे क्रिकेटमध्ये भारताचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

भारताचा यावेळी ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून पराभव केला. यापूर्वीही ऑस्ट्रेलियाने २०२० साली भारताचा असाच १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्याचबरोबर भारताला गेल्यावर्षी इंग्लंडने टी-२० सामन्यात १० विकेट्स राखून पराभूत केले होते. त्याचबरोबर २०२१ साली भारताला पाकिस्तानने असाच १० विकेट्स राखून पराभव केला होता. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत भारताला चारवेळा असे मोठे पराभव पत्करावे लागले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *