मुंबई : बीसीसाआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा केली. पण ही घोषण करत असताना बीसीसीआयने एका मॅचविनर खेळाडूला संघात सरप्राइज एंट्री दिली आहे. हा खेळाडू गेल्या १५ महिन्यांत फक्त दोनच वनडे सामने खेळला आहे. पण तरीही त्याला वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या या मालिकेत संधी देण्यात आली आहे.

या मालिकेसाठी संघ निवडाता बीसीसीआयने बरेच धक्के दिले आहेत. कारण या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी दोन संघ निवडण्यात आले आहेत. पहिला संघ हा प्रथम दोन सामन्यांसाठी असेल. त्यानंतरच्या एका वनडे सामन्यासाठी दुसरा संघ निवडण्यात आला आहे. या दोन्ही संघांत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. पण हा मॅचविनर खेळाडू मात्र दोन्ही संघांत आहे.

बीसीसीआयने या दोन्ही संघांची निवड करताना या मॅचविनर खेळाडूला टीममध्ये कायम ठेवले आहे. या खेळाडूकडे सर्वात चांगला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. निवडड समितीने ज्या खेळाडूला सरप्राइजपणे संघात स्थान दिले आहे तो आहे रवीचंद्रन अश्विन. गेल्या तीन वनडे सामन्यांमध्ये अश्विन हा फक्त दोन वनडे सामना खेळला आहे. त्यामुळे त्याला पुन्हा वनडे संघात स्थान मिळेल, असे कोणालाही वाटत नव्हते. पण अखेर निवड समितीने वनडे वर्ल्ड कपपूर्वी होणाऱ्या या महत्वाच्या मालिकेत त्याला संधी दिली आहे. अश्विनला संधी दिल्यावर बऱ्याच जणांचे डोळे विस्फारले गेले होते. कारण अश्विनला पुन्हा वनडे संघात संधी मिळेल, असे कोणालाच वाटले नव्हते. कारण अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. पण त्याला टी-२० आणि वनडे संघात मात्र स्थान देण्यात येत नव्हते. त्यामुळे जेव्हा अजित आगरकर यांच्या निवड समितीने भारतीय संघाची वनडे मालिकेसाठी घोषणा केली आणि त्यामध्ये अश्विनचे नाव पाहिले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

श्रीलंकेला धूळ चारली, टीम इंडियाचे खेळाडू कलिना एअरपोर्टवर स्पॉट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यतील तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका वनडे वर्ल्ड कपपूर्वी होणार असल्यामुळे तिला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *