भारत-पाक सीमेवर युद्धसदृश परिस्थिती:महाराष्ट्रात शाळा-महाविद्यालये सर्व सुरळीत, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुण्यातील विमानसेवेला फटका

भारत-पाक सीमेवर युद्धसदृश परिस्थिती:महाराष्ट्रात शाळा-महाविद्यालये सर्व सुरळीत, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पुण्यातील विमानसेवेला फटका

पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर भारताने दिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या ऑपरेशननंतर संपूर्ण भारतात एकच जल्लोष केला जात आहे. परंतु यानंतर पाकिस्तानने भारतात अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला जे भारतीय लष्कराने उधळून लावले. भारतीय सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले, तर 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पाकिस्तानने सीमेवर अंधाधुंद गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारत पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला आहे, परंतु याचा फटका पुणे मुंबईलाही बसत असल्याचे दिसत आहे. पुणे व मुंबई येथील उड्डाणसेवा काही शहरांमध्ये बंद करण्यात आली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे या युद्ध परिस्थितीचा मुंबईलाही फटका बसत असल्याचे दिसते. भारत पाक सीमेवर युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र, उर्वरित देशात सगळं काही सुरळीत सुरू असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातही सर्व काही सुरळीत सुरू आहे. शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये तसेच शाळा महाविद्यालये देखील सुरू असून युद्धाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसला नाही. परंतु या उलट परिस्थिती पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. तिथे प्रमुख शहरांमधील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे निर्देश तेथील सरकारने दिले आहेत. भारतात केवळ काही सीमेवरील शहरांमधील विमानवाहतूक सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थितीमुळे पुणे विमानतळाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यावरून विविध शहरात होणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. पुण्यातून देशभरातील 5 शहरांमध्ये होणारी उड्डाणे काही काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. भारताने एयर स्ट्राइक केल्यानंतर देशातील सीमेजवळ असलेले विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बंद केले आहेत. पुण्यातून या भागातील विमानतळांवर सेवा बंद केली आहे. या विमानांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकिटाचे पैसे परत देण्याची किंवा पर्यायी ठिकाण निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे. या पाच शहरांमध्ये पुण्यातून विमानसेवा बंद पुणे विमानतळावरून अमृतसर, राजकोट, जोधरूर, किशनगड, चंडीगड या शहरांसाठीची थेट विमान सेवा सुरू आहे. या शहरांसाठीच्या विमान सेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र भारतीय सैन्याने बुधवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविल्यानंतर या पाच शहरांमधील विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी बुधवारी सकाळपासून 10 मे पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment