मुंबई : मोहम्मद सिराजला नेदरलँड्च्या सामन्यात खेळत असताना दुखापत झाली होती. पण सेमी फायनल आता दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सिराजच्या जागी आता भारतीय संघात मॅचविनर खेळाडूची एंट्री होऊ शकते, असे समोर येत आहे.

सिराज हा नेदरलँड्सच्या सामन्यात झेल पकडण्यासाठी गेला होता. झेल पकडताना त्याचे टायमिंग चुकले आणि नेमका झेल कुठे येईल, हे त्याला समजले नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातात आला नाही तर त्याच्या गळ्यावर आदळला. त्यावेळी सिराजला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली नाही. त्यामुळे भारताच्या कामचलाऊ गोलंदाजांना षटकं टाकावी लागली. पण सिराजची ही दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तो सेमी फायनलच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आता सिराजला पर्याय म्हणून भारतीय संघाने सेमी फायनलसाठी एका मॅचविनर खेळाडूची निवड केली आहे. सेमी फायनल ही वानखेडेच्या मैदानात होणार आहे. या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी पोषक असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या खेळपट्टीवर जास्त धावा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या सामन्यात फक्त गोलंदाज संघात घेऊन चालणार नाही तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू संघात असायला हवा. जो चांगली फलंदाजीही करू शकेल. भारतीय संघापुढे सध्याच्या घडीला दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिला म्हणजे आर. अश्विन, ज्याच्याकडे चांगला अनुभव आहे. दुसरा म्हणजे शार्दुल ठाकूर, ज्याच्या घरच्या मैदानात हा सामना होणार आहे. पण हा सामना भारतासाठी सर्वात महत्वाचा असेल. कारण हा सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल आणि जिंकला तर त्यांना फायनलमध्ये जाता येणार आहे. त्यामुळे या सामन्यात जर सिराज खेळणार नसेल तर त्याच्याजागी आता आर. अश्विनची संघात निवड होऊ शकते, असे आता समोर येत आहे.

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन चाहता, दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा

सेमी फायनलसाठी भारतीय संघात एक मोठा बदल होऊ शकतो, असे समोर येत आहे. त्यामुळे या सामन्यात अश्विनला संधी मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *