जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी पाहिला नाही:रामगिरी महाराजांचे आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर, ‘वंदे मातरम’च राष्ट्रगीत असावेचा पुनरुच्चार
महंत रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीताबद्दल वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून रामगिरी महाराजाला जोड्याने मारला पाहिजे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. या टीकेला रामगिरी महाराज जोरदार प्रत्युत्तर दिले. जितेंद्र आव्हाड मूर्ख माणूस आहे. इतिहास शिकवण्याची गरज नाही. इतिहास आहेच तो फक्त वाचण्याची गरज आहे. परंतु त्यांना इतिहास समजूनच घ्यायचा नाही हे त्यांचे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे. जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते, असे वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले होते. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत होती. त्यात जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे. देशाने आता इतिहास हा रामगिरी कडून शिकायचा आहे, असा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांचा समाचार घेतला होता. जितेंद्र आव्हाडांच्या समाचाराला उत्तर देताना रामगिरी महाराजांनी उपरोक्त टीका केली. ‘वंदे मातरम’च राष्ट्रगीत असावेचा पुनरुच्चार जितेंद्र आव्हाडांसारखा मूर्ख माणूस मी आत्तापर्यंत पाहिला नसल्याचे रामगिरी महाराज म्हणाले. इतिहास आज लिहिलेला नाही. तो आहेच. फक्त तो वाचण्याची गरज आहे, शिकण्याची आवश्यकता नाही. जितेंद्र आव्हाडांना जो आहे तो इतिहास वाचण्याची गरज आहे. परंतु, त्यांना तो वाचायचा नाही, हेच दुर्दैव असल्याचे रामगिरी महाराज म्हणाले. ते अहिल्यानगरमधील एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. त्याबद्दल समाधान व्यक्त करत वंदे मातरम हेच राष्ट्रगीत असावे, असा पुनरुच्चार रामगिरी महाराजांनी केला. रामगिरी महाराजांचे राष्ट्रगीताबद्दलचे वक्तव्य कोणते?
दरम्यान, रामगिरी महाराज यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना जन-गण-मन नाही तर वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत हवे होते, असे वक्तव्य केले होते. रविंद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये कोलकात्यात हे गाणे ब्रिटिश राजवटीच्या काळात गायले होते, असे ते म्हणाले होते. टागोर यांनी हे गाणे त्या काळातील ब्रिटिश सम्राट जॉर्ज पाचवा याच्यासमोर सादर केले. जॉर्ज पाचवा याने भारतीयांना अनेक जखमा दिल्या आहेत. हे गाणे देशासाठी नव्हते, असा दावाही रामगिरी महाराज यांनी केला होता. जितेंद्र आव्हाडांनी काय टीका केली होती?
जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आता त्या रामगिरीला जोड्याने मारण्याची वेळ आली आहे. आता जन-गण-मन यावर देखील त्यांचा आक्षेप आहे. देशाने आता इतिहास हा रामगिरी कडून शिकायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती होती.