काश्मिरात भूकंपाची जोखीम जास्त:तरीही उंच इमारत बांधकाम प्रस्ताव; विरोध सुरू

जम्मू-काश्मीर हा देशातील सर्वाधिक भूकंप जोखमीचा प्रदेश आहे. येथील जमीन भूकंपाच्या सिस्मिक झोन चार आणि पाचमध्ये येते. त्यामुळे येथे दोन-तीनमजली इमारत बांधकामाचे नियम आहेत. मात्र, नॅशनल कॉन्फरन्स सरकार हे नियम बदलण्याच्या तयारीत आहे. सरकारने फ्लोर एरिया रेश्योवरील (एफएआर) निर्बंध हटवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. पर्यावरणतज्ज्ञ, वास्तुकार, सामाजिक संस्था आणि विरोधक या प्रस्तावाच्या विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की काश्मीरची भूस्थैतिकी जास्त भार सहन करण्यास सक्षम नाही. सरकारने प्रस्ताव रद्द करावा. एन्व्हार्नमेंटल पॉलिसी ग्रुपने प्रस्ताव मंजूर झाल्यास काश्मीर धोक्यात येईल, असा इशारा दिला आहे. काश्मीर ज्या प्लेटवर वसले, ते दरवर्षी सुमारे पाच सेंटिमीटरने सरकतेय काश्मीर भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या घर्षण क्षेत्रात आहे. भारतीय प्लेट दरवर्षी ५ सेंटिमीटर उत्तर दिशेने सरकत आहे, ज्यामुळे या भागात मोठा दबाव आहे. येथे वारंवार हलके भूकंप येत आहेत. शिवाय, काश्मीरच्या प्रमुख थ्रस्टमध्ये अनेक भेगा आहेत, ज्या जमिनीतील ताण वरच्या दिशेने सोडत आहेत. याचा अर्थ जमिनीखाली मोठ्या भूकंपाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तीनपेक्षा जास्त मजली इमारती बांधण्याची योजना धोकादायक ठरू शकते. उंच इमारती बांधायच्या असल्यास त्या जपानी भूकंपविरोधी तंत्रज्ञानाने बांधाव्यात. बांधकामात लाकडाला प्राधान्य द्यावे, जेणेकरून जमिनीवरील भार वाढणार नाही. या आदेशाला मंजुरी देण्यापूर्वी भूगर्भशास्त्रज्ञाच्या पॅनलद्वारे काश्मीरच्या जमिनीखालील स्थितीवर सविस्तर सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment