महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे राज्याला संबोधन:राज्य विकासाचा आलेख उलगडला; देशात नाही तर जगातील प्रगत राज्य ठरण्याचा दावा

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे राज्याला संबोधन:राज्य विकासाचा आलेख उलगडला; देशात नाही तर जगातील प्रगत राज्य ठरण्याचा दावा

संयुक्त महाराष्ट्र लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कामगार दिनाच्या देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना देखील त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत हा दहशतवाद ठेचून काढण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, महाराष्ट्राने आपले थोरपणा देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान सिद्ध केले आहे. महाराष्ट्र शूरवीर नवतरुणांची पावण भूमी आहे. तशीच ती समाजसुधारकांची आणि स्वातंत्र्य योद्ध्यांची देखील भूमी आहे. या राज्याला ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, त्याग, प्रतिभा या सदगुणांचे अलौकिक कुंदन लाभले आहे. आपल्या महाराष्ट्राने गेल्या 65 वर्षात उद्योग, शिक्षण, आरोग्य, कृषी, कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक न्याय अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनाचा वारसा लाभला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. प्रत्येक इंच जमिनीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील जागतिक पातळीवर महाराष्ट्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकरी हा आपला पोशिंदा आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या धोरणांना सरकारने नेहमीच पाठिंबा दिला आहे. सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अनेक विक्रमी निर्णय घेतले आहेत. यामुळे राज्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. समृद्ध सिंचनातून समृद्धी हे राज्याचे ध्येय असून राज्यातील प्रत्येक इंच जमिनीला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. महिलांना समान न्याय महाराष्ट्रातील अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प जीवनमान अधिक सुकर करणार आहेत. सांस्कृतिक आणि आधुनिकतेची कास धरत पुढे जाणारे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महिलांना सामान्य मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या महिलांविषयक विविध योजनांची माहिती देखील दिली. इस ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार काम इस ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्व सेवा नागरिकांना सुलभतेने आणि ऑनलाईन मिळत आहेत. त्या सुलभतेने मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. आता या सर्व सेवा whatsapp वर मिळाव्यात असेही नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षित आणि सुसंपन्न राज्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात महाराष्ट्र हे देशातीलच नाही तर जगातील प्रगत राज्य असेल. या संकल्पनेसह आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment