महाराष्ट्रात पहिले AI धोरण होणार जाहीर:तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार, आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्रात पहिले AI धोरण होणार जाहीर:तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार, आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

डिजिटलायजेशनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करण्याच्या सूचना माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज विभागाच्या बैठकीत दिले आहेत. एआय यंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील आणि रोजगार मिळतील, असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या आढावा बैठकीत आशिष शेलार म्हणाले, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो, असे आशिष शेलार म्हणाले. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी 10 हजार 372 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिला पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकार जानेवारी 2025 पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधक अॅप्लिकेशन विकसईत करण्यासाठी विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच आणि विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment