मुंबई: या तारखेला जगाचा अंत होणार आहे, त्या तारखेला जग संपणार आहे, अशा एक ना अनेक भविष्यवाणी तुम्ही ऐकल्या असतील. असे अनेकजण आहेत ज्यांनी पृथ्वीचा अंत होणार असल्याचा दावा केला आहे.

अनेक कॅलेंडर, ज्यामध्ये माया कॅलेंडर वेगळे आहे, त्यातही अशीच भविष्यवाणी होती. मात्र आतापर्यंतचे सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत. आता एका व्यक्तीने म्हटले आहे की या वर्षाच्या अखेरीस पृथ्वीचा अंत होईल. अनेकांनी या घटनेशी सहमती दर्शवली आहे. कारण, आजकाल पृथ्वीच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. पण, यात किती तथ्य आहे हे तर वेळच सांगेल.

मजुराचं नशीब पालटलं, यूएईमध्ये भारतीयाने ४५ कोटी जिंकले, इतक्या पैशांचं काय करणार तेही सांगितलं
आजकाल एथोस श्लोमी सर्वाधिक चर्चेत असलेला भविष्यवेत्ता बनला आहे. त्यांची अनेक भाकितं खरी ठरली आहेत असं मानलं जातं. यामध्ये क्विन एलिझाबेथच्या मृत्यूपासून ते इलॉन मस्कने ट्विटरशी छेडछाड करण्यापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी आहेत. यामध्ये ट्विटरचे नाव बदलणेही समाविष्ट आहे. आता एथोसने जगाच्या अंताची भविष्यवाणी केली आहे. एथोस म्हणतात की या वर्षाच्या शेवटी जगाला त्याच्या विनाशाची सुरुवात दिसेल. हा विध्वंस नैसर्गिक आपत्तींमुळे होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

एथोसच्या भाकितानुसार, डिसेंबरमध्ये भूकंप आणि पुरामुळे जग हादरणार आहे. यासोबतच अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः इंडोनेशिया आणि जावामध्ये हे होण्याची शक्यता आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

याशिवाय, अमेरिका, कोलंबिया आणि कॅनडामध्येही अनेक प्रकारची आपत्ती येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एथोसच्या म्हणण्यानुसार, मानवाने आतापासून काळजी घेतली तर या आपत्तींचा प्रभाव कमी होईल आणि लोकांना फारसा त्रास होणार नाही.

दहा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचं काय झालं? ६ इंच पोकळीत कॅमेरा टाकला, पहिला VIDEO जगासमोर
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *