सौरभ बेंडाळे, नाशिक : शहरात दोन किलोमीटर परिघात एक पोलिस ठाणे आणि दोन पोलिस ठाण्यांतील अंतर चार किलोमीटरपेक्षा जास्त नसावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांना आता चार किलोमीटरची हद्द राहणार असून, नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्याचा विस्तारही लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील वाढती लोकसंख्या, एमआयडीसी व शहरीकरणामुळे जीवनमानासह गुन्ह्यांच्या पद्धतीत बदल होत असल्याने नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार हद्द ठरविली जाणार आहे. सोशल मीडियाचा वाढता वापर, समाजात उमटणारे पडसाद, इंटरनेटद्वारे होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आदींचा विचार करता नव्याने पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमध्ये सुधारित तत्त्वांनुसार कार्यवाही होणार आहे. गृह विभागाने निर्देशित केलेल्या नवीन धोरणानुसार प्रस्तावित नवीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील तीन वर्षांत दखलपात्र गुन्ह्यांची संख्या सरासरी दीडशेपेक्षा अधिक असावी, तर अमली पदार्थ, जुगार व दारूबंदीसह अदखलपात्र, प्रतिबंधात्मक कारवाया, स्थानिक कायद्यान्वये दोनशेपेक्षा जास्त गुन्हे नोंद अपेक्षित आहे. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्यात सन २०१९ मध्ये ३७१, २०२० मध्ये ३६३, २०२१ मध्ये ३०३, २०२२ मध्ये ३९८ आणि २०२३ मध्ये ४०७ महत्त्वाचे गुन्हे दाखल आहेत. अदखलपात्र, प्रतिबंधात्मक, अमली पदार्थ, जुगार व दारूबंदीअंतर्गत सन २०१९ मध्ये ३८४, २०२० मध्ये २७७, २०२१ मध्ये १२३, २०२२ मध्ये १५७ आणि २०२३ मध्ये १४४ गुन्हे दाखल आहेत. त्या अन्वये गृह विभागाच्या धोरणानुसार अंबड पोलिसांच्या हद्दीत सलग तीन वर्षे गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीसह नव्याने विकसित होणाऱ्या शहराचाही भाग आहे. त्यामुळे प्रस्तावित चुंचाळे (एमआयडीसी) पोलिस ठाण्याचा मंजुरीचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे.

पोलीस नाहक त्रास देत असल्याचा नागरिकांचा आरोप, आमदार विनोद निकोले रस्त्यावर, वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं

शहरातील पोलिस ठाण्यांतील अंतर

उपनगर ते इंदिरानगर : ६.५ किलोमीटर

नाशिकरोड ते देवळाली कॅम्प : ६.५ किलोमीटर

सातपूर ते अंबड : ५.३ किलोमीटर

आडगाव ते म्हसरूळ : ४.७ किलोमीटर

गंगापूर ते सातपूर : ४ किलोमीटर

सरकारवाडा ते मुंबई नाका : २.८ किलोमीटर

म्हसरूळ ते पंचवटी : २.४ किलोमीटर

मुंबई नाका ते इंदिरानगर : २.३ किलोमीटर

भद्रकाली ते सरकारवाडा : २.२ किलोमीटर

येथेही विस्ताराची गरज…

उपनगर, इंदिरानगर, नाशिकरोड व देवळाली कॅम्प या चार पोलिस ठाण्यांतील अंतर इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत अधिक आहे. इंदिरानगर व उपनगर पोलिसांची हद्द खूप मोठी असल्याने प्रभावी पोलिसिंगवर त्याचा परिणाम जाणवत आहे. देवळाली कॅम्प पोलिसांची हद्द भगूरच्याही पुढे जात असल्याने ग्रामीण भागापर्यंत शहर पोलिसिंग सुरू आहे. हीच स्थिती नाशिकरोड पोलिसांचीही आहे. त्यामुळे तेथेही विस्ताराची गरज निर्माण झाली आहे. यासह गुन्हेगारी नियंत्रणासह कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी नाशिक तालुका, ओझर आणि सिन्नर पोलिस ठाण्यातील काही भाग आयुक्तालयात वर्ग करण्याचा प्रस्ताव आयुक्तालयाने यापूर्वीच दिला आहे. इगतपुरी, घोटी आणि वाडीवऱ्हे ठाण्यांचे क्षेत्रही आयुक्तालायकडे देण्याच्या प्रस्तावाचे कामकाज सुरू आहे. सन २००७ ते ०९ आणि २०१५ ते १९ पासून आतापर्यंत वेळोवेळी आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र विस्तारण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. आगामी सिंहस्थापर्यंत आयुक्तालयाच्या विस्तारीकरणाला मंजुरी मिळण्याची पोलिस दलास अपेक्षा आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे…

-नवीन तालुकानिर्मिती झालेल्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे असावे

-शहरीकरण, औद्योगिकीकरण, मोठ्या प्रमाणात नवीन शहरे वसविणे (सेझ), मोठ्या निवासी कॉम्प्लेक्सपासून दोन किलोमीटर परिघात पोलिस ठाणे असावे

-ग्रामीण पोलिसांत दोन पोलिस ठाण्यांतील अंतर १० किलोमीटर, तर शहरी भागात ४ किलोमीटरपेक्षा जास्त नसावे

-लोकसंख्येची घनता, विशेष भौगोलिक स्थान, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे असावे

-वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी व अपघातप्रवण ठिकाणी वाहतूक पोलिस चौकी असावी

Dahanu News: थेट रस्त्यावर उतरत आमदार विनोद निकोलेंनी पोलिसांना फैलावर घेतलं, सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *