नागपूर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात एका अधिकाऱ्याची संपूर्ण राज्यात चर्चा होती, ते अधिकारी म्हणजे समीर वानखेडे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कक्ष अर्थात एनसीबीच्या माध्यमातून त्यांनी ड्रग्ज तस्कर आणि बॉलीवूड इंडस्ट्रीला हादरवून सोडलं होतं. समीर वानखेडे हे एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. तर, काहीच दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे लवकरच राजकारणाच्या रिंगणात उतरण्याचीही चर्चा समोर आली होती. त्यानंतर आता समीर वानखेडे हे पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरसह नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील स्मृती मंदिरात पोहोचले. त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी आज नागपुरातील रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले. समीर वानखेडे हे सपत्नीक आरएसएसच्या स्मृती मंदिरात गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या असून सध्या याची जोरदार चर्चा होत आहे.

Sameer Wankhede: मिस्टर अँड मिसेस वानखेडेंची जाहिरात चर्चेत, समीर वानखेडे राजकारणाच्या मैदानात उतरणार?
समीर वानखेडे हे आज सापत्नीक नागपूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षाभूमी येथील अस्थिकलशाचे दर्शन घेत मध्यवर्ती स्मारकाची परिक्रमा केली आणि पुष्ण अर्पण करून अभिवादन केले. यानंतर समीर वानखेडे यांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराला भेट देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्यंसेवक संघाच्या व्हिजिट बुकवर मनोगतही व्यक्त केले.

समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरण

समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदी असताना अनेक अशा कारवाया केल्या ज्या प्रचंड गाजल्या. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने मुंबईतील ड्रग्ज रॅकेट मोडून काढण्यासाठी अनेक कारवाया केल्या. या काळात एनसीबीने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचीही चौकशी केली होती. विशेषत: कॉर्डिलिया क्रुझवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेली कारवाई प्रचंड गाजली होती. यावेळी समीर वानखेडे यांच्या पथकाने बॉलीवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यामुळे आर्यन खान अनेक दिवस तुरुंगात होता. मात्र, नंतरच्या काळात नवाब मलिक यांनी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढत ही कारवाई म्हणजे केवळ एक बनाव असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे लाईमलाईटमध्ये असलेल्या समीर वानखेडे आणि एनसीबीला प्रचंड मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला
एनसीबीने याप्रकरणात आर्यन खानवरील सर्व आरोपही मागे घेतले. तसेच, समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही उजेडात आले होते. या सगळ्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली. तेव्हा वानखेडे यांची रवानगी चेन्नई येथे भारतीय महसूल सेवा (IRS) विभागात करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *