भोपाळ: मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये लग्नाचं वऱ्हाड वधूविनाच परतलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाचे काही विधी झाले. पण, सप्तपदीपूर्वी वराने १० लाख रुपयांची मागणी केली आणि मग तो रागाच्या भरात निघून गेला.हे संपूर्ण प्रकरण पिचोरच्या भौंटी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मानपुरा गावाशी संबंधित आहे. येथे २१ मे रोजी भूपेंद्रचे एका मुलीशी लग्न होणार होते. सर्व नातेवाईक लग्नासाठी जमले होते. वऱ्हाड दारात आलं, वर-वधूने एकमेकांच्या गळ्यात हारही घातला. यानंतर लग्नाचे इतर विधी सुरु होते. अचानक रात्री ३ वाजण्याच्या सुमारास नवरदेवाने रागाच्या भरात भर मांडवातून पळ ठोकला.

दारात मांडव, घरात आनंद; तेवढ्यात अनर्थ घडला, लग्नाच्या तीन दिवसांपूर्वी नवरदेवाचा मृत्यू
सप्तपदीपूर्वी नवरदेव पळाला

मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच वराचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, तो कुठेच दिसत नव्हता. मुलीच्या वडिलांनी वराला बोलावले असता तो हुंड्याची मागणी करू लागला. त्याने १० लाख रुपयांचे वॉशिंग मशीन मागितले.

मुलीच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले. पण काही झाले नाही. वराचे नातेवाईक वधूला न घेताच परतले. यानंतर २२ मे रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी भौंटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी वर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नटून थटून नवरदेव आला अन् बोहल्यावर चढण्याअगोदरच जेलमध्ये गेला, प्रेयसीमुळे पोलखोल

वधूने सांगितलं की, लग्नाचे काही विधी झाले होते. तीन वाजता सप्तपदीची वेळ आली तेव्हा वराने १० लाख रुपयांची मागणी सुरू केली. आधी तीन लाख रुपयांत लग्न ठरले होते. आता वधूनेही वराशी लग्न करण्यास नकार दिला आहे.

वधूचे वडील आशाराम सांगतात की, मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी लग्न मोडले. आता आम्ही आमच्या मुलीचे लग्न त्या मुलाशी करणार नाही. आम्ही एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा.

आई-वडिलांनी आयुष्य संपवलं, दादाने भावंडांना सावरलं, तिघे भाऊ पहिल्याच प्रयत्नात पोलिस झाले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *