वाचा-पृथ्वी शॉपेक्षा धोकादायक आहे हा कोहली; फक्त गोलंदाजांची धुलाई नाही तर विकेट देखील घेतो
काँग्रेसचा राजीनामा दिल्याच्या विषयावर विचारले असता, सत्यजित तांबे यांनी यावेळी बोलणार असल्याचं उत्तर दिले. तर भापचा पाठींबा यासह इतर राजकीय विषयावरही सत्यजित तांबे यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता याबाबत आपण नंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगत तांबे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळले.
वाचा- ‘उजेड’ नावाचे गाव; महाराष्ट्रातील या गावात भरते आगळीवेगळी गांधी बाबाची जत्रा!
जे निवडणूक येतात, त्यांना परत बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे यासाठी आण्णा हजारे प्रयत्न करत आहे. यावर तांबे यांनी आण्णा हजारे यांचे समर्थन केले. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच याच्यावर अविश्वास दाखल होतो, पण आमदारांवर होत नाही, त्यामुळे त्यांची चूक झाली तर त्यांना परत बोलावण्याचा अधिकार असला पाहिजे, आण्णा हजारे यांच्या मताशी मी सहमत असल्याचं सत्यजित तांबे यावेळी म्हणाले.