श्रीकांत शिंदेंकडून सरकारचे अभिनंदन:मुंबईत लागलेल्या पोस्टरचेही केले समर्थन; सर्व पक्षीय बैठकीनंतर मानले आभार

भारताच्या वतीने जे पाऊल उचलले जाईल, जी कारवाई केली जाईल, त्याच्या सोबत भारतातील सर्व पक्षीय नेते सरकार सोबत उभे आहेत. हा अतिशय सकारात्मक आणि कौतुकास्पद निर्णय असल्याचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. इतर वेळी राजकारण सुरूच असते. मात्र आज सर्वांनी एकसंघ दाखवणे महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वृत्तसंस्थेशी बोलत होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे काम केले. आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो असे देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरची सरकारने अंमलबजावणी केली आहे, त्याबद्दल मी भारतीय सेना आणि केंद्र सरकारचे अभिनंदन करत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात होता. मात्र, आज संरक्षण मंत्र्यांनी सर्व पक्ष बैठकीमध्ये केवळ दहशतवादी केंद्रांवर भारत सरकारच्या वतीने हल्ले करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पहलगाम येथील हल्ल्याला केंद्र सरकारने ज्या पद्धतीने उत्तर द्यायला हवे होते, तसेच उत्तर सरकारने आणि भारतीय सेनेने दिले असल्याचे देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. भारतीय सेनेने कौतुकास्पद कारवाई केली आहे. भारतीय सैनिकांनी पूर्ण ताकतीने दहशतवादी केंद्राला उध्वस्त करण्याचे काम केले आहे. इतक्या वर्षापासून भारतीय सेनेने आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची सैनिकांसोबत उभे राहण्याची भावना आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे अभिनंदन आणि कौतूक करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. त्याचे समर्थन देखील श्रीकांत शिंदे यांनी या माध्यमातून केले आहे. सरकारचे समर्थन म्हणून आभार सर्वपक्षीय बैठकीनंतर, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, “सरकार जे काही करत आहे त्याचे सर्व नेते समर्थन करतात आणि म्हणूनच मी सर्व पक्षांचे आभार मानतो. सरकार आणि सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ कसे राबवले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. संरक्षण मंत्र्यांनी असेही म्हटले की, आम्ही (भारताने) नागरिकांना लक्ष्य केले आहे असा पाकिस्तान चालवत असलेला खोटा प्रचार चुकीचा आहे, आम्ही दहशतवादाचे केंद्रस्थान नष्ट केले असल्याचे माहिती त्यांनी दिली असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.