बंगळुरू: आयसीसी विश्वचषक २०२३ चा पुढील सामना भारत नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारताने याआधीच गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित केले आहे. अशा स्थितीत नेदरलँडविरुद्धच्या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा भारताच्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही. पण या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या सामन्यातून तीन स्टार खेळाडूंना वगळले जाऊ शकते.

प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल का होणार?

भारतासाठी पुढील सामना ही केवळ औपचारिकता आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आपल्या काही स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन संघात काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. भारत थेट नेदरलँडनंतर उपांत्य फेरीत खेळणार आहे. या सामन्यात सर्व खेळाडूंनी तंदुरुस्त राहणे अत्यंत गरजेचे आहे, पण जर कोणी दुखापत झाली तर रोहित शर्माला त्याचा बॅकअप घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पुढील सामन्यात भारतीय संघात बदल करून नव्या खेळाडूंना संधी देईल, अशा चर्चा सुरु आहेत.

संघात ३ बदल होणार

कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सर्व प्रथम, उत्कृष्ट फॉर्मात असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली जाऊ शकते. फिरकी आणि फलंदाजीची जादू असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या जागी रविचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. तिसरा बदल असेल तो म्हणजे उपकर्णधार केएल राहुलच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत, त्यांना विश्रांती देऊन दुखापतीपासून त्यांना वाचवणे हे त्यांना वगळण्याचे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *