नवी दिल्ली: एखाद्या संघाची वादळी कामगिरी कशी असते हे पाहायचे असेल तर भारतीय संघाची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहावी. एक-दोन नव्हे तर सलग ८ विजयानंतर रोहित सेना सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. विश्वविजेता होण्यासाठी भारताला अजून फक्त २ विजय (सेमीफायनल आणि फायनल) हवे आहेत. भारतीय संघाचे प्रत्येक डावपेच बरोबर पडत आहेत संघातील प्रत्येक खेळाडू शानदार कामगिरी करतोय. गेल्या दोन महिन्यात भारतीय संघातील सर्व काही बदलले आहे. संघाच जे काही कमकुवत बाजू होत्या तिच आता ताकद झाली आहे. स्पर्धा सुरू झाली तेव्हा भारतासह अन्य काही संघ विजेतेपदाचे दावेदार होते आता तर संपूर्ण जग म्हणत आहे टीम इंडियाला विश्वविजेतेपद मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अर्थात हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला दोन नॉकआउट मॅच जिंकाव्या लागतील.

रोहित शर्माची धोनीवाली स्टाईल आणि खतरनाक रणनिती


टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये रोहित शर्मा मैदानावर अनेक वेळा चिडलेला दिसला. रोहितची जी प्रतिमा होती त्याच्या अगदी विरुद्ध हे दिसत होते. शांत आणि संयमी कर्णधार अशी त्याची ओळख होती. पण स्पर्धेचा त्याच्यावर अतिरिक्त दबाव दिसत होता. अर्थात यावेळी मात्र चित्र वेगळे दिसत होते. प्रतिस्पर्धी संघासाठीची त्याची रणनिती आणि मैदानावरील सकारात्मक दृष्टीकोनने सर्व काही बदलले. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध देखील तो मैदानावर सातत्याने मेसेज पाठवत होता, ज्याचे सर्वजण कौतुक करत होते. विराट कोहलीने देखील सांगितले की संघाची रणनिती होती की मैदानावर टीकायचे. रोहित शर्मा हा यासाठीच ओळखला जातो. गोलंदाजांचा कर्णधार, खेळाडूंचा कर्णधार.

भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; वर्ल्डकप सुरु असताना मोठी कारवाई; श्रीलंकेचे क्रिकेट बोर्ड बरखास्त

प्रत्येक खेळाडू देतोय १०० टक्के


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर भारतीय संघात खुप काही बदल झालेत. केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह यांचे कमबॅक झाले. संघ तर मजबूत झाला पण प्रत्येक खेळाडू कामगिरी देखील करू लागला. हार्दिक पंड्याच्या गैरहजेरीत देखील संघ सहज विजय मिळवतोय आता संघात कोणतीही कमतरता नाही. फक्त प्रत्येक खेळाडूंना स्वत:ची जबाबदारी पार पाडावी. बुमराह, सिराज आणि शमी ही जलद गोलंदाज कमाल करत आहेत. कुलदीप आणि जडेजा यांनी फिरकीची जबाबदारी उत्तम पद्धतीने पार पाडली आहे.

घरचे मैदान आणि परिस्थिती सोबत प्रेक्षकांचा पाठिंबा

भारतीय संघासाठी आणखी एक X फॅक्टर म्हणजे स्पर्धा भारतात होत आहे. चारही बाजूला टीम इंडियाला प्रोत्साहन देणारे लोक आहेत. स्टेडियमवर निळा समुद्रच दिसतो. प्रत्येक शॉट, कॅच आणि विकेटवर जिंकणार तर भारतच, विराट-विराट, रोहित-रोहित बूम-बूम बुमराह, शमी अशी घोषणा सुरू असतात ज्या प्रतिस्पर्धी संघाच्या मनात आणखी भिती निर्माण करतात. मैदानावरील चाहते हे भारताचे १२वे खेळाडू आहेत. भारताच्या मॅचला असे वाटते की हे मैदान नसून संघातील एक खेळाडूच आहे. यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढतोय.

BAN vs SL: बांगलादेशच्या संघाचे लज्जास्पद कृत्य! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी घटना कधीच घडली नाही
संघाचा दृष्टीकोन आणि वनडेमध्ये टी-२० स्टाइल

रोहित शर्मा सलामीला येताच पहिल्या चेंडूपासून प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करतो. ज्या पद्धतीने त्याने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदी, हारिस राऊफ आणि द.आफ्रिकेच्या मार्को यानसेन, लुंगी एगिडी यांच्यावर हल्ला चढवला होता. तेथेच भारताने मॅच जिंकण्यास सुरुवात केली. इंग्लंडविरुद्धची रोहितची फलंदाजी विसरणे अशक्यच. या शिवाय गिल, विराट, अय्यर, केएल राहुल हे देखील मोठा हातभार लावत आहेत. भारताने पहिल्या १० ओव्हरमध्ये स्फोटक फलंदाजी करण्याचे ठरवले आहे.

क्रिकेटमधील Timed Out नियम काय आहे? फलंदाजाला कसे बाद दिले जाते, सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या
राहुल द्रविडचे मार्गदर्शन आणि ड्रेसिंग रूमचे वातावरण

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या ज्युनिअर संघाने वर्ल्डकप जिंकला होता. शुभमन गिल तेव्हा संघात होता. द्रविड हा फार फोकस खेळाडू आहे. त्याची प्रोसेस धीमी असते पण लक्ष्यावरील फोकस कमी होत नाही. संघाला एका ट्रॅकवर आणल्यानंतर आता वर्ल्डकप जिंकण्याची तयारी सुरू झाली आहे. वर्ल्डकपच्या आधी त्यांनी संघाच्या फिटनेस आणि दिनक्रम निश्चित केला होता. आता त्याचा रिझल्ट देखील मिळतोय. आता भारतीय चाहत्यांची एकच इच्छा असेल की २००३ किंवा २०१९च्या वर्ल्डकपप्रमाणे एक वाईट दिवस येऊ नये आणि भारतीय संघाचा विजय रोखला जाईल. ही एक गोष्ट वगळता आता स्पर्धेत भारतासमोर सर्वांनी हात जोडले आहेत.

Read Latest Sports News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *