मोबीन खान, अहमदनगर (शिर्डी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप काही दिवसांपासून आपल्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. सेनेकडून शिर्डी लोकसभेचा शब्द मिळून देखील माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना सेनेत प्रवेश देऊन लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणार असल्याची चर्चा असल्याने बबनराव घोलप नाराज आहेत. अद्याप देखील त्यांच्या तिकिटाचा सेनेकडून ठरलं नसून त्यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे बबनराव घोलप यांनी नुकतीच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. तर, त्यांचे पुत्र सेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र घोलप पिता पुत्राच्या मनात चाललंय तरी काय असा प्रश्न शिवसैनिकांसह मतदारांना पडला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ २००९ साली एससी राखीव झाल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेकडून खासदार झाले. नंतर २०१४ साली वाकचौरेंनी शिवबंधन झुगारुन काँग्रेसचा हात थांबला यावेळी सेनेकडून बबनराव घोलप यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत आलं मात्र काही कारणास्तव बबनराव घोलप यांना निवडणुक लढवता आली नाही. त्यांनंतर सेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली आणि ते अवघ्या १७ दिवसांत खासदार झाले. परंतु, मागील वर्षी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर लोखंडे यांनी देखिल ठाकरेंची साथ सोडली.यावेळी आदित्य ठाकरे शिर्डीत संवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता त्यांनी बबनरावांना तयारीला लागा असे सांगितले होते.
​सहप्रवाशानं गोड बोलून बिस्कीट खायला दिलं, ते घेतलं अन् तिथंच फसले, वृद्धाने लाखो गमावले..​
बबनराव घोलप त्यानंतर तयारीला लागले त्यांच्यावर शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली गेली नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. मात्र, वाकचौरेंच्या घर वापसीने पुन्हा उमेदवारीचा पेच निर्माण झाला. त्यामुळे बबनराव घोलप सध्या नाराज आहे. मात्र, घोलप पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी किंवा वंचित मध्ये प्रवेश केल्यास नाशिक येथे आमदार सरोज अहिरे आणि शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचं टेन्शन वाढणार हे मात्र नक्की आहे.
योगेश घोलप शरद पवारांच्या भेटीला, ठाकरे गटात खळबळ, देवळालीचं समीकरण बदलणार, सरोज अहिरेंचं टेन्शन वाढणार?

दोन्ही पक्ष शिवसेनेचे मित्र पक्ष

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित हे दोन्ही पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे मित्र पक्ष असल्याने त्यांच्या अध्यक्षांची आम्ही पिता पुत्रांनी त्यांची भेट घेतलेली आहे.

विजयानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला मी कधीच असा विचार केला नव्हता की….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *