ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान:म्हणाल्या – सर्व निवडणुका आपल्या सोयीने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान:म्हणाल्या – सर्व निवडणुका आपल्या सोयीने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी कायम राहणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे. सर्व निवडणुका आपल्या सोईने लढलो तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? असे मत सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले, मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप करत टीका करत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? याबाबत अनेक प्रश्न होते. त्यातच आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून सुप्रिया सुळे यांनीही आपले मत मांडताना उपरोक्त विधान केले. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
संजय राऊत यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची महापालिकेची निवडणूक आम्ही वेगवेगळीच लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे? त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. सगळ्याच निवडणुका सर्वजण आपआपल्या सोईने लढवायला लागले, तर कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना न्याय कधी मिळणार? त्यामुळे महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काय म्हणाले होते संजय राऊत?
मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वळावर लढण्याचे सांगितले आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते? असे देखील ते म्हणाले. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. हे ही वाचा… मविआ तोडण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी:आंबेडकरांचा आरोप; त्यांना जायचेच असेल तर आम्ही थांबवणारे कोण? -आव्हाड शिवसेनेच्या ठाकरे गटाने आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment