नवी दिल्ली: मोहम्मद सिराज हा एक असा खेळाडू आहे ज्याने टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक काळ असा होता जेव्हा सिराजची जबरदस्त धुलाई होत असून तो खूप धावा देत असे आणि त्याच्यावर खूप टीकाही झाली. मात्र या टीकेमुळे सिराजने आपल्या खेळात सुधारणा केली आणि आता त्याचे नाव जगभरात प्रसिद्ध होत आहे. आशिया चषक २०२३ मधील अंतिम सामन्यात त्याने शानदार गोलंदाजीच नाही केली तर इतिहास रचला. एका षटकात ४ विकेट्स घेणारा तो जगातील दुसरा आणि भारतातील पहिला गोलंदाज ठरला आहे. आता त्याच्या या गोलंदाजीचे कौतुक माजी पाकिस्तानी गोलंदाजाने केले आहे.

आशिया कप २०२३ च्या फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध सिराजने जे केले ते सामान्य नव्हते. रविवार १७ सप्टेंबर रोजी इतिहासाच्या पानात त्याचे नाव नोंदवले गेले. सिराजने फायनलमध्ये ७ षटकांच्या स्पेलमध्ये २१ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. त्याने एकट्याने श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सिराजने पथुम निसांका, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा आणि दासुन शनाका यांना बाद केले. सिराजने श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडवून दिली होती. त्याच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला अवघ्या ५० धावांत ऑलआउट केले. अशा स्थितीत भारताने आशिया चषकाची अंतिम फेरी १० गडी राखून जिंकली.

आता सर्वजण सिराजची खूप स्तुती करत आहेत आणि त्याच्या स्तुतीचे पूल बांधत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही मोहम्मद सिराजचे कौतुक केले आहे. त्यांनी फक्त २ शब्दात सिराजचे कौतुक केले. मात्र, बांगलादेशकडून भारताचा पराभव झाल्यावर त्यांनी टीम इंडियावर जोरदार टीका केली. पण सिराजच्या स्पेलनंतर त्यांचे शब्द बदलले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

शोएब अख्तर सिराजबद्दल काय म्हणाला

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेला शोएब अख्तर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देत असतो. अशा परिस्थितीत जेव्हा आशिया कपच्या फायनलमध्ये सिराजची कामगिरी पाहून शोएब अख्तरने एक ट्विट केले होते. मात्र, त्याने सिराजचे नाव घेऊन स्तुती केली नाही. पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं त्यावरून ते फक्त सिराजबद्दलच लिहित असल्याचं स्पष्ट होतं. अख्तर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘हा विनाश आणि प्रलय आहे.’
सिराजने आतापर्यंत भारतासाठी २१ कसोटी, २९ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याने अनुक्रमे ५९, ५३ आणि ११ बळी घेतले आहेत. आता वर्ल्डकपमध्येही सिराजकडून खूप अपेक्षा असतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *