नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दोन सामने आशिया कप स्पर्धेत झाले. पण त्यानंतर मात्र आता पाकिस्तानळी क्रिकेटचे सामने होणार नाहीत, असे भारताचे युथ अफेअर आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ठणकावून सांगितले आहे. भारत पाकिस्तानशी क्रिकेटचे सामना का खेळणार नाही, याचे कारण ही यावेळी ठाकूर यांनी सांगितले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, एक कर्नल, एक मेजर आणि एक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपणी देणे थांबवत नाही, तोपर्यंत मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने होणार नाहीत, असे स्पष्टपणे अनुराग ठाकूर यांनी सांगितले आहे.

याबाबत अनुराग ठाकूर म्हणाले की, “बीसीसीआयने आधीच निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याशी द्विपक्षीय सामने खेळणार नाही. हे भारतीय नागरिकांच्या भावनांशी सुसंगत आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला मदत करणे ठांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे क्रिकेट सामने आम्ही खेळणार नाही.”

आता काही दिवासंनी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वी आता अनुराग ठाकूर यांनी हा पवित्रा घेतला आहे. पण वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार की नाही, याबाबत मात्र चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. अनुराग ठाकूर यांनी जेव्हा आपली भूमिका मांडली, त्यामध्ये त्यांनी वर्ल्ड कपबााबत कोणीतेही मत व्यक्त केले नाही. वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा १४ ऑक्टोबरला होणार आहे. पण ठाकूर यांनी जो पवित्रा घेतला आहे, त्यामुळे हा सामना होणार की याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण अनुराग ठाकूर हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय क्रिकेट मालिकाबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो, असे दिसत आहे.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून द्विदेशीय मालिका झालेली नाही. आता ती लवकर होईल, अशी चिन्हंदेखील दिसत नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तान याबाबत काय मत व्यक्त करते, याकडे क्रिकेट विश्वातील सर्व चाहत्यांचे डोळे लागलेले असतील यात शंकाच नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *