उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा मोठा धक्का:राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांच्या वतीने SC मध्ये जाण्याचा इशारा

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा मोठा धक्का:राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांच्या वतीने SC मध्ये जाण्याचा इशारा

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मात्र आमची न्यायालयीन लढाई सुरू राहणार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात युती सरकारच्या वतीने आधीच 7 आमदारांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. आता या निर्णयामुळे त्या आमदारांना देखील दिलासा मिळाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका आणि इतर काही अन्य याचिकांवर सुनावणी पार पडली होती. त्यावेळी या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण करुन हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान निर्णय राखून ठेवताना हायकोर्टाने याप्रकरणी कोणतेही निर्देश सरकारला दिलेले नव्हते. त्यामुळे नव्या युती सरकारने यातील 7 जागावर नवीन नियुक्त्या केल्या होत्या. या आमदारांचा शपथविधी थांबवण्यासाठी देखील या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही न्यायालयाने कोणतेही निर्देश दिले नव्हते. आता अखेर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. नेमके प्रकरण काय?

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment