मुंबई: विश्वचषक २०२३ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला दोन उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. भारतीय संघ १५ नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडेवर न्यूझीलंडशी भिडणार आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. आता या दोन सामन्यांशी संबंधित काही नियमांबद्दल जाणून घेऊया.

पाऊस पडला तर काय होईल?

उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर पावसाने व्यत्यय आणला आणि सामना नियोजित वेळेनुसार पूर्ण होऊ शकला नाही, तर तो राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी, सामना पहिल्या दिवशी जिथे थांबला होता तिथून सुरू होईल. पण पावसामुळे राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर अंतिम फेरीत कोण जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल!

राखीव दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर साखळी टप्प्यातील गुणतालिकेतील स्थान विचारात घेतले जाईल. उदाहरणार्थ, भारत आणि न्यूझीलंडमधील उपांत्य फेरी राखीव दिवशीही पूर्ण झाली नाही, तर भारत पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडच्या वरच्या स्थानावर आहे. या स्थितीत भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. असाच काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात होऊ शकतो.

दिवाळीच्या फटाक्यांमध्येही क्रिकेट वर्ल्डकप फिव्हर! बाजारात बॅट आणि बॉलचे फटाके

हवामानाचा अंदाज काय आहे?

जर आपण हवामानाबद्दल बोललो तर १५ नोव्हेंबरला मुंबईचे हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. कोलकाताबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीत पाऊस लपंडाव खेळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की उपांत्य फेरीचा सामना १७ नोव्हेंबरलाही बघायला मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *