नवी दिल्ली : सहारा इंडिया कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर सहाराश्रींनी मुंबईतील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सहाराश्रींच्या निधनानंतर सहाराच्या लाखो गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की आता त्यांच्या पैशाचे काय होणार? गेली अनेक वर्ष अडकून राहिलेले पैसे यापुढे आता गुंतवणूकदार मिळवू शकतील का, की सुब्रत रॉय सहारा यांच्या निधनानंतर त्यांचे पैसेही बुडतील? गुंतवणूकदारांच्या पैशाचे काय होणार, असे प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

सहारा गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय होणार?
सहारा इंडियाचे प्रमुख सहश्री सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहेत तो म्हणजे की आता त्यांच्या पैशाचे काय होणार, त्यांना गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळेल का? प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना पैसे मिळतील अशी आशा होती, पण आता सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय होणार? अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Subrata Roy: एकेकाळी टीम इंडियाचे प्रायोजक, श्रीमंतीच्या शिखरावरून कशी झाली सुब्रत रॉय यांच्या पतनाची सुरुवात
तर वरील प्रश्नावर सहाराच्या गुंतवणूकदारांनी सुटकेचा निश्वास सोडावे कारण सुब्रत रॉय सहाराच्या निधनामुळे परतावा प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही. सहारा गुंतवणूकदारांचे अकदल्ली पैसे परत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच एक पोर्टल सुरू केले होते, ज्याद्वारे सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत केली जात आहे. त्यामुळे सहाराश्रींच्या निधनामुळे परताव्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.

Subrata Roy Dies: एक पत्र अन् सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रत रॉय तुरुंगात, असं काय लिहिलं होत ‘त्या’ पत्रात?
सहारामध्ये अडकलेला परतावा कसा मिळणार?
सहाराच्या गुंतवणूकदारांचे पैसे सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमध्ये अडकले असून सरकारने अलीकडेच लाँच केलेल्या पोर्टलद्वारे अर्ज करून गुंतवणूकदार परतावा मिळवू शकतात. यासाठी गुंतवणूकदारांना फक्त ऑनलाइन दावा करावा लागेल ज्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पावत्या प्रविष्ट (अपलोड) कराव्या लागतील. तर पडताळणीनंतर परतावा गुंतवणूक करणाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात आहे.

Read Latest Business News

लक्षात घ्या की सरकार गुंतवणूकदारांना हप्त्याने पैसे परत करत असून दावा प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे. गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो टोल फ्री क्रमांकावर (१८०० १०३ ६८९१ / १८०० १०३ ६८९३) संपर्क साधू शकतो. २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सहाराच्या गुंतवणूकदारांना दिलासा देत त्यांचे पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने सहारा रिफंड पोर्टल https://mocrefund.crcs.gov.in/ सुरू करण्यात आले ज्याद्वारे सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत केले जात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *