Category: marathi

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.  

शर्यतीच्या नादात वांद्रे-वरळी सागरी सेतुवर भीषण अपघात:दोन भरधाव आलीशान गाड्यांच्या धडकेत टॅक्सी उलटली

शर्यतीच्या नादात वांद्रे-वरळी सागरी सेतुवर भीषण अपघात:दोन भरधाव आलीशान गाड्यांच्या धडकेत टॅक्सी उलटली

मुंबई येथील वांद्रे-वरळी सागरी सेतुवर रविवारी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन आलीशान गाड्यांमध्ये शर्यत लागली होती. या शर्यतीत या भरधाव गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. या धडकेत टॅक्सीमधील प्रवासी व चालक जखमी झाले आहेत. तसेच टॅक्सीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताप्रकरणी दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतुवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत यंत्यात वेगात सुरू झाली व काही अंतर पुढे जाताच या दोन्ही कारचालकांचा कारवरील ताबा सुटला आणि थेट समोर असलेल्या टॅक्सीवर जाऊन जोरची धडक बसली. या धडकेत टॅक्सी पुलावरच पलटी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गाड्या जप्त करत दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूलाच्या 19 क्रमांकाच्या पिलरजवळ हा अपघात झाला आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतुवर सुसाट वेगाने कार चालविण्यास सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर दोघांच्याही हातून त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले व समोर प्रवाशांनी भरलेल्या टॅक्सीला जोरदार धडक बसली. दोन्ही भरधाव गाड्यांनी एकसाथ टॅक्सीला धडक दिल्याने टॅक्सी पूलावरच पलटी झाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅक्सीमधील जखमी चालक व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच तातडीने वरळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार चालकांना अटक केली तसेच त्यांच्या गाड्या देखील जप्त केल्या. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

​मुंबई येथील वांद्रे-वरळी सागरी सेतुवर रविवारी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. दोन आलीशान गाड्यांमध्ये शर्यत लागली होती. या शर्यतीत या भरधाव गाड्यांनी एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. या धडकेत टॅक्सीमधील प्रवासी व चालक जखमी झाले आहेत. तसेच टॅक्सीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघाताप्रकरणी दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे वरळी सागरी सेतुवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. ही शर्यत यंत्यात वेगात सुरू झाली व काही अंतर पुढे जाताच या दोन्ही कारचालकांचा कारवरील ताबा सुटला आणि थेट समोर असलेल्या टॅक्सीवर जाऊन जोरची धडक बसली. या धडकेत टॅक्सी पुलावरच पलटी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व दोन्ही गाड्या जप्त करत दोन्ही आलीशान गाड्यांच्या चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूलाच्या 19 क्रमांकाच्या पिलरजवळ हा अपघात झाला आहे. बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतुवर सुसाट वेगाने कार चालविण्यास सुरुवात केली. काही अंतर पुढे गेल्यावर दोघांच्याही हातून त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले व समोर प्रवाशांनी भरलेल्या टॅक्सीला जोरदार धडक बसली. दोन्ही भरधाव गाड्यांनी एकसाथ टॅक्सीला धडक दिल्याने टॅक्सी पूलावरच पलटी झाली. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. टॅक्सीमधील जखमी चालक व प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच तातडीने वरळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज कार चालकांना अटक केली तसेच त्यांच्या गाड्या देखील जप्त केल्या. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.  

मुंबई काँग्रेसचा बडा नेता फडणवीस यांच्या घरी:गणपतीचे दर्शन घेण्याचे निमित्त, पण पडद्यामागे राजकारण असल्याचा दावा; चर्चेला उधाण

मुंबई काँग्रेसचा बडा नेता फडणवीस यांच्या घरी:गणपतीचे दर्शन घेण्याचे निमित्त, पण पडद्यामागे राजकारण असल्याचा दावा; चर्चेला उधाण

मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानी धडक दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा करत त्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. अमीन पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी व संजय निरुपम या 3 बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. या दोघांच्या सत्ताधारी आघाडीत जाण्यामुळे काँग्रेसला हादरा बसला असताना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमीन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा केली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमीन पटेल काही वेगळा विचार करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण पटेल यांनी स्वतः ही चर्चा फेटाळून लावली आहे. फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन घेतले -पटेल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमीन पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 2 कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरात विराजमान गणपतीचे दर्शन घेतले. आणि दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद ए मिलाद नबी आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येणार आहेत. त्याची परवानगी लोकांना हवी आहे. याविषयी पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अतिथी आला की पुष्पगच्छ द्यावा लागतो – बावनकुळे दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमीन पटेल व फडणवीसांच्या भेटीत काहीही नवे नसल्याचे स्पष्ट केले. अमीन पटेल केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. काल शरद पवार साहेबांनीही अमरीश पटेल यांच्या खासगी हेलिपॅडचा वापर केला होता. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. पण काल अमरीश पटेल हाती तुतारी धरणार असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. पवारांनी गिरीश महाजनांनाही घेरले दरम्यान, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 21 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिलीप खोडपे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना घेरल्याची चर्चा सुरू झाली आहे.

​मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी सोमवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या येथील निवासस्थानी धडक दिली. यावेळी त्यांनी फडणवीसांशी चर्चा करत त्यांच्या निवासस्थानी विराजमान गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. अमीन पटेल यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी व संजय निरुपम या 3 बड्या नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला होता. या दोघांच्या सत्ताधारी आघाडीत जाण्यामुळे काँग्रेसला हादरा बसला असताना आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार अमीन पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत प्रदिर्घ काळ चर्चा केली. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमीन पटेल काही वेगळा विचार करत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण पटेल यांनी स्वतः ही चर्चा फेटाळून लावली आहे. फडणवीसांच्या गणपतीचे दर्शन घेतले -पटेल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर अमीन पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 2 कारणांसाठी गेलो होतो. एक म्हणजे मी त्यांच्या घरात विराजमान गणपतीचे दर्शन घेतले. आणि दुसरे म्हणजे 18 तारखेला ईद ए मिलाद नबी आहे. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्यात येणार आहेत. त्याची परवानगी लोकांना हवी आहे. याविषयी पोलिसांकडून विशेष सहकार्य मिळावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. अतिथी आला की पुष्पगच्छ द्यावा लागतो – बावनकुळे दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अमीन पटेल व फडणवीसांच्या भेटीत काहीही नवे नसल्याचे स्पष्ट केले. अमीन पटेल केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यात राजकारण करण्यासारखे काहीही नाही. काल शरद पवार साहेबांनीही अमरीश पटेल यांच्या खासगी हेलिपॅडचा वापर केला होता. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. अतिथी आला की पुष्पगुच्छ द्यावा लागतो. पण काल अमरीश पटेल हाती तुतारी धरणार असल्याच्या बातम्या चालवण्यात आल्या. हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. पवारांनी गिरीश महाजनांनाही घेरले दरम्यान, शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 21 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. दिलीप खोडपे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पवारांनी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांना घेरल्याची चर्चा सुरू झाली आहे.  

शिंदे सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधात:​​​​​​​गतवर्षी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता, अंबादास दानवे यांचा घणाघात

शिंदे सरकार मराठवाड्याच्या जनतेविरोधात:​​​​​​​गतवर्षी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांना वाटण्याच्या अक्षता, अंबादास दानवे यांचा घणाघात

आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध आहे. या सरकारने गतवर्षी संभाजीनगरात घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केला. राज्य सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगरात मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा व २० निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण ३७ हजार १६ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच ९ हजार ६७ कोटी ९० लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेल्याचे स्पष्ट होते. या सरकारच्या एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार सपशेल अपयशी अंबादास दानवे यांनी यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी तब्बल १४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षांमध्ये सदरील प्रकरणी फक्त प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी अशा संथ गतीने गेल्यास पुढील २० वर्षेही प्रकल्प पूर्ण होणार नाही. रस्त्यांचे काम पूर्ण होणार की नाही याविषयी शंका मराठवाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आगामी काळात १२ हजार ९३८ कोटी रुपयांचे कामे राज्य शासन हाती घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. मात्र अद्यापपर्यंत फक्त ३०४ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून हायब्रीड अन्युटी योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे धोरण बदलल्यामुळे हे रस्ते पूर्ण होणार की नाही याची शंका सुद्धा निर्माण झाल्याची भिती अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला असल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ कोटी रुपये खर्च करुन स्मारक बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु आज रोजी या स्मारकाच्या घोषणेची सद्यस्थिती पाहता पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमिनीची मागणी केली आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळख असणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकाच्या घोषणाकडे असे शासन दुर्लक्ष करत असेल तर सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान असल्याचीअसल्याची भावना यावेळी दानवे यांनी प्रकट केली. दूध क्रांतीची भीमगर्जनाही हवेतच राज्य शासनाने अडचणीत असलेल्या मराठवाड्यातील शेतीला जोडधंदा म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत ८६०० गावांमध्ये ३ हजार २२५ कोटी रुपये खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाद्वारे मराठवाड्यात दूध क्रांती येणार असल्याची भीमगर्जना केली होती.मात्र, मुख्यमंत्री आपल्या शब्दावरून पलटले असून सदरील घोषणेचा फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी यावेळी दिली. मराठवाड्यात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली तर होती. परंतु या घोषणाचे मागील एक वर्षात काय झाले याचे सुस्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र २ नोव्हेंबर २०२३ रोजी या संबंधित एक समिती गठीत करण्यात आली होती, तिला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याव्यतिरिक्त सदरील प्रकरणी कसलेही कामकाज झाले नसल्याची माहिती दानवे यांनी दिली. सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली मंत्रिमंडळ बैठकीच्या एक वर्षानंतर राज्य शासनाने केलेल्या घोषणांकडे पाहिले असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याची पूर्णतः फसवणूक केली असून एका वर्षात सर्व घोषणांकडे प्रशासकीय व शासकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाच एका वर्षात राहिली असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. सकल मराठा समाजाच्या वतीनेही सदरील मागण्या वेळोवेळी आंदोलन करून राज्य सरकार समोर मांडण्यात आलेल्या आहे. मात्र राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करून वेळ काढूपणा आणि मराठा समाजाला फसवत असल्याची भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली.

​आताचे राज्य सरकार मराठवाड्याच्या जनतेविरुद्ध आहे. या सरकारने गतवर्षी संभाजीनगरात घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्याचा घणाघात शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी केला. राज्य सरकारने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगरात मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेतली होती. या बैठकीत तब्बल 100 पेक्षा अधिक घोषणा व २० निर्णय घेण्यात आले होते. मराठवाड्यातील विकास कामांसाठी एकूण ३७ हजार १६ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. तसेच ९ हजार ६७ कोटी ९० लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते. वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाकडे पाहिले असता राज्य शासनाने मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्याची केलेली घोषणा हवेतच विरून गेल्याचे स्पष्ट होते. या सरकारच्या एकाही विकासात्मक कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त लागला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. राज्य सरकार सपशेल अपयशी अंबादास दानवे यांनी यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी तब्बल १४ हजार ४० कोटींची स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता. एका वर्षांमध्ये सदरील प्रकरणी फक्त प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी अशा संथ गतीने गेल्यास पुढील २० वर्षेही प्रकल्प पूर्ण होणार नाही. रस्त्यांचे काम पूर्ण होणार की नाही याविषयी शंका मराठवाड्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत आगामी काळात १२ हजार ९३८ कोटी रुपयांचे कामे राज्य शासन हाती घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. मात्र अद्यापपर्यंत फक्त ३०४ कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून हायब्रीड अन्युटी योजने अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे धोरण बदलल्यामुळे हे रस्ते पूर्ण होणार की नाही याची शंका सुद्धा निर्माण झाल्याची भिती अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील दगडाबाई शेळके यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला असल्याने राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ कोटी रुपये खर्च करुन स्मारक बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु आज रोजी या स्मारकाच्या घोषणेची सद्यस्थिती पाहता पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी जालना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमिनीची मागणी केली आहे. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळख असणाऱ्या या स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकाच्या घोषणाकडे असे शासन दुर्लक्ष करत असेल तर सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान असल्याचीअसल्याची भावना यावेळी दानवे यांनी प्रकट केली. दूध क्रांतीची भीमगर्जनाही हवेतच राज्य शासनाने अडचणीत असलेल्या मराठवाड्यातील शेतीला जोडधंदा म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत ८६०० गावांमध्ये ३ हजार २२५ कोटी रुपये खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाद्वारे मराठवाड्यात दूध क्रांती येणार असल्याची भीमगर्जना केली होती.मात्र, मुख्यमंत्री आपल्या शब्दावरून पलटले असून सदरील घोषणेचा फेरविचार करण्यात येत असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी यावेळी दिली. मराठवाड्यात क्रीडा संस्कृती निर्माण व्हावी यासाठी राज्य सरकारने संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली तर होती. परंतु या घोषणाचे मागील एक वर्षात काय झाले याचे सुस्पष्ट माहिती समोर आली नाही. मात्र २ नोव्हेंबर २०२३ रोजी या संबंधित एक समिती गठीत करण्यात आली होती, तिला ३० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. याव्यतिरिक्त सदरील प्रकरणी कसलेही कामकाज झाले नसल्याची माहिती दानवे यांनी दिली. सरकारने मराठवाड्याची फसवणूक केली मंत्रिमंडळ बैठकीच्या एक वर्षानंतर राज्य शासनाने केलेल्या घोषणांकडे पाहिले असता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्याची पूर्णतः फसवणूक केली असून एका वर्षात सर्व घोषणांकडे प्रशासकीय व शासकीय पातळीवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. मागासले पण दूर करून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करू मुख्यमंत्र्यांची ही निव्वळ घोषणाच एका वर्षात राहिली असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी यावेळी राज्य सरकारवर केला. सकल मराठा समाजाच्या वतीनेही सदरील मागण्या वेळोवेळी आंदोलन करून राज्य सरकार समोर मांडण्यात आलेल्या आहे. मात्र राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे सर्रास दुर्लक्ष करून वेळ काढूपणा आणि मराठा समाजाला फसवत असल्याची भावना यावेळी दानवे यांनी व्यक्त केली.  

हिंदू समाज देशाचा कर्ता व देशाचा शिल्पकार:सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

हिंदू समाज देशाचा कर्ता व देशाचा शिल्पकार:सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान

रविवारी राजस्थान येथील अलवर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत येथे बोलताना म्हणाले, हिंदू असणे म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्याची श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो. हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मोहन भागवत म्हणाले, हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून या मूल्यांचा वारसा मिळालेला आहे. हिंदू शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नव्हे तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. तसेच संपत्तीचा वापर स्वतःसाठी न करता परोपकारासाठी करतो. शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो. संघाला विरोध करणारेच संघाचा आदर करतात मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा संघाला फारसे कोणी ओळखत नव्हते. पण त्याला आता व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्माचे रक्षण महत्त्वाचे मोहन भागवत म्हणाले, राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब आणि प्रचार करावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण मोहन भागवत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे पिढीची पारंपरिक मूल्यांशी झपाट्याने स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील तसेच सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण होईल.

​रविवारी राजस्थान येथील अलवर या ठिकाणी आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत येथे बोलताना म्हणाले, हिंदू असणे म्हणजे उदार असणे, प्रत्येकाला सद्भावना दाखवणे, मग त्याची श्रद्धा, जात, आहार पद्धत काहीही असो. हिंदू समाज हा देशाचा कर्ता आहे. त्यामुळे या देशात काहीही घडले तरी त्याचा परिणाम हिंदू समाजावर होतो आणि चांगले घडले तर हिंदूचा अभिमान वाढतो, कारण हिंदू समाज हा देशाचा शिल्पकार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. मोहन भागवत म्हणाले, हिंदू असणे म्हणजे जगातील सर्वात उदार व्यक्ती असणे, जी व्यक्ती सर्वांना सामावून घेते, सर्वांसमोर सद्भावना दाखवते. आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो, तोच मुळात एक वैश्विक मानवधर्म आहे. हिंदूंना सर्वांचे कल्याण हवे असते. हिंदूंना त्यांच्या महान पूर्वजांकडून या मूल्यांचा वारसा मिळालेला आहे. हिंदू शिक्षणाचा वापर कोणालाही कमी दाखवण्यासाठी नव्हे तर ज्ञान वाटण्यासाठी करतात. तसेच संपत्तीचा वापर स्वतःसाठी न करता परोपकारासाठी करतो. शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतो. संघाला विरोध करणारेच संघाचा आदर करतात मोहन भागवत म्हणाले, हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणाऱ्याला हिंदू मानले जाते. तो कोणाची पूजा करतो, कुठली भाषा बोलतो, त्याची जात, प्रदेश किंवा आहाराच्या सवयी काय, याचा काहीही फरक पडत नाही. एक काळ होता जेव्हा संघाला फारसे कोणी ओळखत नव्हते. पण त्याला आता व्यापक मान्यता प्राप्त झाली आहे. संघाला बाहेरून विरोध करणारे अनेक लोक आहेत. पण मनातून तेच लोक याचा आदर बाळगतात. राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्माचे रक्षण महत्त्वाचे मोहन भागवत म्हणाले, राष्ट्राच्या विकासासाठी हिंदू धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संघाच्या स्वयंसेवकांनी सामाजिक समरसता, पर्यावरण, कौटुंबिक मूल्य, आत्म जागरूकता आणि नागरी अनुशासन या पाच मूलभूत तत्वांचा अवलंब आणि प्रचार करावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले. महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण मोहन भागवत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कौटुंबिक मूल्यांमध्ये घसरण होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर जबाबदार आहे. यामुळे पिढीची पारंपरिक मूल्यांशी झपाट्याने स्पर्श होत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी आठवड्यातून एकदा धार्मिक कार्यक्रम आणि भोजनासाठी एकत्र यावे. यामुळे परस्पर संबंध दृढ होतील तसेच सांस्कृतिक मूल्यांचेही रक्षण होईल.  

राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणाले, नरेंद्र मोदींचे डोके सडले, मानसिक संतुलन ठीक नाही; निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप

राऊत यांचे वादग्रस्त वक्तव्य:म्हणाले, नरेंद्र मोदींचे डोके सडले, मानसिक संतुलन ठीक नाही; निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोप

आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पीएम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे डोके सडलेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोपही केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे डोके सडलेले आहे. झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर. महाराष्ट्रात ती योग्य कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही टीका निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत. कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली होती. यावरही राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवरही साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री निवडणुकीबद्दल बोलतील का? ते फक्त तारीख देत आहेत. निवडणूक कधी होणार, हे निवडणूक आयोगाने सांगायला हवे, एकनाथ शिदेंना ते सांगत आहेत. त्यांना माहिती आहे का? दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका?” जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांना महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाहीत, तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे, असे आम्ही म्हणतो. लोकसभा निवडणुकीत हेच झाले, विधानसभा निवडणुकीतही तेच होईल. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…

​आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पीएम मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की, त्यांचे डोके सडलेले आहे, त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावरही पक्षपाताचा आरोपही केला. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे डोके सडलेले आहे. झारखंडमध्ये जर लाडकी बहीण सारखीच असलेली योजना चुकीची असेल तर. महाराष्ट्रात ती योग्य कशी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. निवडणूक आयोगावरही टीका निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत. कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली होती. यावरही राऊत यांनी टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवरही साधला निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधत ते म्हणाले की, “मुख्यमंत्री निवडणुकीबद्दल बोलतील का? ते फक्त तारीख देत आहेत. निवडणूक कधी होणार, हे निवडणूक आयोगाने सांगायला हवे, एकनाथ शिदेंना ते सांगत आहेत. त्यांना माहिती आहे का? दिल्लीत नोव्हेंबरमध्ये निवडणुका?” जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांना महाराष्ट्रात निवडणुका घ्यायच्या नाहीत, तोपर्यंत आमचा विजय निश्चित आहे, असे आम्ही म्हणतो. लोकसभा निवडणुकीत हेच झाले, विधानसभा निवडणुकीतही तेच होईल. राज्यातील इरतही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचा…  

मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार:निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎

​मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्य रात्रीपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करत आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून होताना दिसत आहे. त्यासाठी खासदार संदिपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली. मात्र, तरी देखील ते उपोषणावर ठाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आज मध्यरात्री पासून जरांगे पाटील उपोषण सुरू करतात का॰ याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. मात्र,तत्पूर्वी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनधरणीचे प्रयत्न सुरू मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर निवडणुकीच्या आधी सरकारला घेरण्याची मनोज जरांगे पाटील यांनी योजना आहे. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून ते पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. त्या आधीच सरकारच्या वतीने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही. भुमरे ‎यांची जरांगेंसोबत 2 तास चर्चा‎ छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान‎भुमरे यांनी रविवारी आंतरवाली सराटीत ‎मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघा‎ नेत्यांमध्ये अडीच तास चर्चा झाली. 16 ‎सप्टेंबरला रात्री 12 वाजेपासून जरांगे पुन्हा‎ एकदा आंतरवाली सराटीत उपोषणाला‎ बसणार आहेत. तसेच यापूर्वी जरांगे यांनी ‎खासदार संदिपान भुमरे यांच्यावर नाराजी‎ व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने संदिपान ‎भुमरे यांनी जरांगे यांची भेट घेत नाराजी दूर‎ केल्याचे समोर आले. या भेटीत दोघा ‎नेत्यांमधील चर्चेचा तपशील जाहीर झालेला ‎नाही खासदार संदिपान भुमरे यांनी अचानकपणे आंतरवाली सराटी गाठल्याने राजकीय ‎वर्तुळाच चर्चा झाली. जरांगे पाटील यांची भेट ‎मी नेहमीच भेट घेतो. या आधी जेव्हा जरांगे‎ उपोषणाला बसले होते, त्या वेळीही मी त्यांची‎भेट घेतली होती. समाजाच्या हितावर आमची‎चर्चा झाली, असे भुमरे म्हणाले.‎  

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात काही भागात पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता; तर गणेशोत्सवामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

दिव्य मराठी अपडेट्स:राज्यात काही भागात पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता; तर गणेशोत्सवामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

​​​​​​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स विसर्जनासाठी मुंबईत २०४ कृत्रिम तलाव केले तयार मुंबई – अनंत चतुर्दशीदिनी मंगळवारी होणाऱ्या श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयी-सुविधांसह सज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांंवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था केली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटारबोटी तैनात केल्या आहेत.

नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू नंदुरबार – गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा तळ्यानजीकच्या चारीची कडा तुटल्याने पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथील जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात रविवारी घडली. हर्षल हनुमंत पाटील (१५ रा. हनुमंतखेडा ता. पारोळा, जि. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी नारायणगावात‎युवकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या‎ पैठण – मराठा आरक्षणासाठी २८ वर्षीय तरुणाने‎राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही‎‎घटना रविवारी (दि.१५) दुपारी‎‎तालुक्यातील नारायणगाव येथे‎‎घडली. शिवनाथ नारायण बर्डे‎‎(२८) असे मृताचे नाव आहे.‎‎रविवारी दुपारी नारायणगाव येथील‎‎शिवनाथने राहत्या घरी रुमालाच्या‎सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या‎खिशातून पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे.‎ नांदेडला दोन ट्रकमधून‎रेशनचा गहू, तांदूळ जप्त‎ नांदेड‎ – पोलिस अधीक्षकांच्या विशेष‎पथकाने काळ्या बाजारात जाणारा‎रेशनचा तांदूळ आणि गव्हाचा साठा‎आणि दोन ट्रक शनिवारी रात्री‎पकडले. कारवाईत दोन ट्रकसह ४५‎लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त‎केला. गेल्या १५ दिवसांतील ही‎पाचवी कारवाई आहे. गस्तीवरील‎पोलिस पथकाने उमरी-तळेगाव‎रोडवरुन आयशर ट्रक (एम.एच -‎२६-बी.ई.७३३७) पकडला. ट्रकमध्ये‎सुमारे ४ लाख रुपयांचा गव्हाचा‎साठा आढळला. तसेच दुसऱ्या‎ट्रकमध्ये (एम.एच- २६ बी.ई.७८३५)‎१ लाख रुपये किमतीचे तांदळाचे कट्टे‎आढळले. दोन्ही वाहने कारवाईत‎ताब्यात घेतली. दोन्ही वाहने ताब्यात‎घेऊन उमरी पोलिसांच्या ताब्यात‎देण्यात आली आहेत. एकाला‎पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचे नाव‎उघड केलेले नाही. पुरवठा विभागास‎पत्रव्यवहार करुन अहवाल मागवला.‎ जादूटोण्याचा संशय; मारहाणीत ५ जणांचा मृत्यू कोंटा – सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस ठाणे हद्दीतील इटकल गावात गावकऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून ५ जणांना काठीने बेदम मारहाण करून त्यांना ठार केले. यात एकाच कुटुंबातील दोन पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी या कुटुंबीयांवर जादूटोण्याचा आरोप करत घरावर हल्ला केला. हे कुटुंबीय आम्ही निष्पाप असल्याचे सांगत असतानाच जमावाने घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेनंतर इटकल रहिवासी मौसम कन्ना (६०), मौसम बुच्चा (३४), मौसम बिरी, कारका लच्छी (४३), मौसम आरजो (३२) अशी मृतांची नावे आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबरला बलौदा बाजार जिल्ह्यात ४ जणांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसकडून प्रदेश सहप्रभारी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार अकोला – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलेल्या काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघातून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. आता सोमवारी प्रदेश सहप्रभारी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. सर्व पाचही मतदारसंघात ४९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यातून स्वबळाच्या चाचपणीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

​​​​​​​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स विसर्जनासाठी मुंबईत २०४ कृत्रिम तलाव केले तयार मुंबई – अनंत चतुर्दशीदिनी मंगळवारी होणाऱ्या श्री गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. विसर्जन सुलभ, निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सुमारे १२ हजार अधिकारी – कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयी-सुविधांसह सज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांवर व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी येणारे वाहन चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत याकरीता चौपाटीच्या किनाऱ्यांंवर ४७८ स्टील प्लेट तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४३ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था केली आहे. चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६१ जीवरक्षकांसह ४८ मोटारबोटी तैनात केल्या आहेत.

नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू नंदुरबार – गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा तळ्यानजीकच्या चारीची कडा तुटल्याने पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथील जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात रविवारी घडली. हर्षल हनुमंत पाटील (१५ रा. हनुमंतखेडा ता. पारोळा, जि. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी नारायणगावात‎युवकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या‎ पैठण – मराठा आरक्षणासाठी २८ वर्षीय तरुणाने‎राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही‎‎घटना रविवारी (दि.१५) दुपारी‎‎तालुक्यातील नारायणगाव येथे‎‎घडली. शिवनाथ नारायण बर्डे‎‎(२८) असे मृताचे नाव आहे.‎‎रविवारी दुपारी नारायणगाव येथील‎‎शिवनाथने राहत्या घरी रुमालाच्या‎सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताच्या‎खिशातून पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे.‎ नांदेडला दोन ट्रकमधून‎रेशनचा गहू, तांदूळ जप्त‎ नांदेड‎ – पोलिस अधीक्षकांच्या विशेष‎पथकाने काळ्या बाजारात जाणारा‎रेशनचा तांदूळ आणि गव्हाचा साठा‎आणि दोन ट्रक शनिवारी रात्री‎पकडले. कारवाईत दोन ट्रकसह ४५‎लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त‎केला. गेल्या १५ दिवसांतील ही‎पाचवी कारवाई आहे. गस्तीवरील‎पोलिस पथकाने उमरी-तळेगाव‎रोडवरुन आयशर ट्रक (एम.एच -‎२६-बी.ई.७३३७) पकडला. ट्रकमध्ये‎सुमारे ४ लाख रुपयांचा गव्हाचा‎साठा आढळला. तसेच दुसऱ्या‎ट्रकमध्ये (एम.एच- २६ बी.ई.७८३५)‎१ लाख रुपये किमतीचे तांदळाचे कट्टे‎आढळले. दोन्ही वाहने कारवाईत‎ताब्यात घेतली. दोन्ही वाहने ताब्यात‎घेऊन उमरी पोलिसांच्या ताब्यात‎देण्यात आली आहेत. एकाला‎पोलिसांनी ताब्यात घेतले, त्याचे नाव‎उघड केलेले नाही. पुरवठा विभागास‎पत्रव्यवहार करुन अहवाल मागवला.‎ जादूटोण्याचा संशय; मारहाणीत ५ जणांचा मृत्यू कोंटा – सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस ठाणे हद्दीतील इटकल गावात गावकऱ्यांनी जादूटोण्याच्या संशयावरून ५ जणांना काठीने बेदम मारहाण करून त्यांना ठार केले. यात एकाच कुटुंबातील दोन पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गावकऱ्यांनी या कुटुंबीयांवर जादूटोण्याचा आरोप करत घरावर हल्ला केला. हे कुटुंबीय आम्ही निष्पाप असल्याचे सांगत असतानाच जमावाने घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेनंतर इटकल रहिवासी मौसम कन्ना (६०), मौसम बुच्चा (३४), मौसम बिरी, कारका लच्छी (४३), मौसम आरजो (३२) अशी मृतांची नावे आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबरला बलौदा बाजार जिल्ह्यात ४ जणांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसकडून प्रदेश सहप्रभारी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार अकोला – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलेल्या काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघातून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले. आता सोमवारी प्रदेश सहप्रभारी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. सर्व पाचही मतदारसंघात ४९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यातून स्वबळाच्या चाचपणीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  

वीस ते पंचवीस गावांचा रस्त्याचा प्रश्न सुटणार:खड्डे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार

वीस ते पंचवीस गावांचा रस्त्याचा प्रश्न सुटणार:खड्डे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार

रस्ते म्हटले तर विकासाचे जाळे मानले जाते दरम्यान, इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळन झाली आहे. पश्चिम पट्यातील व भाम धरण परिसरातील जवळपास वीस ते तीस खेड्यांचे दळणवळण असलेल्या गावंच्या रस्त्यांची वाट बिकट झाली होती मात्र माजी जीप सदस्य जनार्दन माळी यांच्या प्रयत्नातून व आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून पूर्ण होणार असून येथील खडे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार आहे. यामध्ये शिदवाडी ते खैरगांव रस्ता, काळुस्ते गाव ते कांचनगाव व तळोघ रस्ता दुरुस्ती, जुनवनेवाडी ते तळोघ रास्ता, तारंगनपाडा ते तळोशी कांचनगाव रस्ता तसेच बोर्ली ते मुंबई रस्त्या हायावे करणे या रस्त्याचे उदघाट्न आज आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून करण्यात आले आहे. यावेळी खैरगाव व कांचनगाव येथे कार्यक्रम पार पडला यावेळी जनार्दन माळी, रामदास गव्हाणे, पंकज माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अरुण गायकर, नीलेश गव्हाणे, उपस्थित होते.

​रस्ते म्हटले तर विकासाचे जाळे मानले जाते दरम्यान, इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळन झाली आहे. पश्चिम पट्यातील व भाम धरण परिसरातील जवळपास वीस ते तीस खेड्यांचे दळणवळण असलेल्या गावंच्या रस्त्यांची वाट बिकट झाली होती मात्र माजी जीप सदस्य जनार्दन माळी यांच्या प्रयत्नातून व आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून पूर्ण होणार असून येथील खडे पडलेले रस्ते आता पूर्ण पणे नवीन होणार आहे. यामध्ये शिदवाडी ते खैरगांव रस्ता, काळुस्ते गाव ते कांचनगाव व तळोघ रस्ता दुरुस्ती, जुनवनेवाडी ते तळोघ रास्ता, तारंगनपाडा ते तळोशी कांचनगाव रस्ता तसेच बोर्ली ते मुंबई रस्त्या हायावे करणे या रस्त्याचे उदघाट्न आज आमदार हिरामन खोसकर यांच्या निधीतून करण्यात आले आहे. यावेळी खैरगाव व कांचनगाव येथे कार्यक्रम पार पडला यावेळी जनार्दन माळी, रामदास गव्हाणे, पंकज माळी यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी अरुण गायकर, नीलेश गव्हाणे, उपस्थित होते.  

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची छापेमारी:साडेपंधरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची छापेमारी:साडेपंधरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त

बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला लगाम लावण्यासाठी बोराखेडी पोलिसांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी छापेमारी करत १५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ३१ बेशिस्त वाहनांवर कारवाई करत १९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी केली. बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर तसेच बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात पथक नेमण्यात आले होते. त्यामध्ये सपोनि बालाजी शेंगेपल्लू, पीएसआय राजेंद्र कपले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर महाजन, शरद खर्चे, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, सुपडासिंग चव्हाण, अशोक आडोकार, पोकॉ अभिनंदन शिंदे, श्रीकांत चिंचोले, गणेश वाघ यांचा समावेश करण्यात आला. या पथकाने अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर छापेमारी करत पिंप्री गवळी येथील विजयसिंग हरसिंग राणे, आडविहीर येथील रामेश्वर जगन सोनुने, तांदुळवाडी येथील धनराज जुनारे, डिडोळा बु. येथील विश्वनाथ खांडेकर, डिडोळा येथील संदीप शिराळ, वडगाव येथील संजय पाटील, दाभाडी येथील वासुदेव खर्चे यांच्याकडून १५ हजार ६८० रुपयांची देशी, विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा मागील काही दिवसांपासून काही वाहनधारक त्यांची वाहने अस्ताव्यस्त उभी करत होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच काही युवक परवाना नसताना भरधाव वाहने चालवून स्टंटबाजी करत होते. तर काही वाहनधारक वाहतुकीचे नियम मोडून ट्रिपल सीट वाहने चालवत होते. अशा ३१ बेशिस्त वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार १९ हजार रुपये अनपेड दंडात्मक कारवाई १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

​बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला लगाम लावण्यासाठी बोराखेडी पोलिसांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी छापेमारी करत १५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच ३१ बेशिस्त वाहनांवर कारवाई करत १९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी केली. बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर तसेच बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सारंग नवलकार यांच्या नेतृत्वात पथक नेमण्यात आले होते. त्यामध्ये सपोनि बालाजी शेंगेपल्लू, पीएसआय राजेंद्र कपले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर महाजन, शरद खर्चे, पोहेकॉ नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, सुपडासिंग चव्हाण, अशोक आडोकार, पोकॉ अभिनंदन शिंदे, श्रीकांत चिंचोले, गणेश वाघ यांचा समावेश करण्यात आला. या पथकाने अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर छापेमारी करत पिंप्री गवळी येथील विजयसिंग हरसिंग राणे, आडविहीर येथील रामेश्वर जगन सोनुने, तांदुळवाडी येथील धनराज जुनारे, डिडोळा बु. येथील विश्वनाथ खांडेकर, डिडोळा येथील संदीप शिराळ, वडगाव येथील संजय पाटील, दाभाडी येथील वासुदेव खर्चे यांच्याकडून १५ हजार ६८० रुपयांची देशी, विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेशिस्त वाहनधारकांवर पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा मागील काही दिवसांपासून काही वाहनधारक त्यांची वाहने अस्ताव्यस्त उभी करत होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच काही युवक परवाना नसताना भरधाव वाहने चालवून स्टंटबाजी करत होते. तर काही वाहनधारक वाहतुकीचे नियम मोडून ट्रिपल सीट वाहने चालवत होते. अशा ३१ बेशिस्त वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार १९ हजार रुपये अनपेड दंडात्मक कारवाई १४ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.