Monthly Archive: September, 2024

अर्जुन तेंडुलकरने घेतल्या 9 विकेट:गोव्याला एक डाव अन् 189 धावांनी विजय मिळवून दिला; कर्नाटकात खेळतोय देशांतर्गत क्रिकेट

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. कर्नाटक इन्व्हिटेशनल स्पर्धेत गोव्याकडून खेळताना अर्जुनने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर गोव्याने कर्नाटक-11 विरुद्ध एक डाव आणि 189 धावांनी विजय मिळवला. रणजी ट्रॉफीचा नवा सीझन सुरू होण्यापूर्वी अर्जुनने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. कर्नाटकने देशांतर्गत क्रिकेटच्या दृष्टीने इन्व्हिटेशनल स्पर्धेचे आयोजन केले...

जम्मू-काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जारी:भूमिहीन शेतकऱ्यांना 4000 भत्ता, तरुणांना ₹3500 बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन; कलम 370 चा उल्लेख नाही

काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा, असे म्हटले आहे. संपूर्ण जाहीरनाम्यात कलम 370 चा कुठेही उल्लेख नाही. पक्षाने भूमिहीन शेतकऱ्यांना दरवर्षी 4,000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत आणि एका वर्षासाठी बेरोजगार तरुणांना दरमहा 3,500 रुपये बेरोजगारी भत्ता देण्याची घोषणा केली आहे. गरीब कुटुंबांना दिले जाणारे 5 किलो रेशन 11 किलोपर्यंत वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले...

भारत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या फायनलमध्ये:सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला, कर्णधार हरमनप्रीतने केले 2 गोल

भारत सहाव्यांदा आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. सोमवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 असा पराभव केला. हा सामना चीनमधील हुलुनबुर येथील मोकी हॉकी प्रशिक्षण तळावर खेळला गेला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग सहावा विजय आहे. भारताकडून कर्णधार हरमनप्रीतने सर्वाधिक 2 गोल केले. त्यांच्याशिवाय उत्तम सिंग आणि जर्मनप्रीतने प्रत्येकी 1 गोल केला. दक्षिण कोरियाकडून...

CFSL अहवाल- संदीप घोष यांनी दिशाभूल केली:प्रॉलीग्राफ चाचणीतील प्रश्नांची उत्तरे विचलित करणारी, CBI चे 6 आरोप; कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरण

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचे उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे आढळून आले आहे. संदीप घोष यांची पॉलीग्राफ चाचणी आणि आवाजाचे विश्लेषण करण्यात आले. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (CFSL) अहवालात घोष यांच्या विधानांची तपासणी केली असता, विधाने दिशाभूल करणारी असल्याचे आढळून आले. पीटीआय या वृत्तसंस्थेने या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. मात्र, पॉलीग्राफ...

देशातील चांगल्या-वाईटासाठी हिंदूच जबाबदार- मोहन भागवत:कारण तेच राष्ट्राचे कर्तेधर्ते; नवी पिढी मूल्ये विसरत चालली, ही चिंतेची बाब

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले – देशात काही चांगले घडले तर हिंदू समाजाची कीर्ती वाढते. काही चूक झाली तर ती हिंदू समाजावर पडते, कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत. हिंदू धर्माची व्याख्या सांगतांना ते म्हणाले – ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो खरा मानवधर्म आहे. हा जागतिक धर्म आहे आणि तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतो. कौटुंबिक...

PM मोदी म्हणाले – माझी खिल्ली उडवली गेली:मी सरदारांच्या भूमीत जन्मलेला मुलगा, शांतपणे देशहिताची धोरणे बनवण्यात मग्न राहिलो

गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या GMDC मैदानावर आयोजित केलेल्या भव्य स्वागत समारंभाला हजेरी लावली. येथे ते म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मी पहिल्यांदाच गुजरातमध्ये आलो आहे. तुम्ही लोकांनी माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव केला आहे. मुलगा घरी येऊन आशीर्वाद घेतो तेव्हा उत्साह अनेक पटींनी वाढतो. अनेकांनी माझी खिल्ली उडवली, पण मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीत...

सीताराम येचुरी यांचे न्यूमोनियामुळे निधन:लहान मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक आजार, जाणून घ्या 10 महत्त्वाच्या प्रतिबंधात्मक टिप्स

सीपीआय(एम) सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांचे गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. येचुरी यांना श्वसनमार्गाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे गुंतागुंतीमुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला. श्वसनमार्गाचे संक्रमण अनेक रोगजनुकांमुळे होऊ शकते. त्यांच्यामध्ये व्हायरस आणि बॅक्टेरिया प्रमुख आहेत. हे रोगजनुके संक्रमित व्यक्तींच्या थेट संपर्कातून किंवा...

ICC पॅनेलमध्ये सलीमा पहिली पाकिस्तानी महिला अम्पायर:म्हणाल्या- हा फक्त माझा नाही तर स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक पाकिस्तानी महिलेचा विजय आहे

सलीमा इम्तियाज ICC अंपायर पॅनेलमध्ये समाविष्ट होणारी पाकिस्तानची पहिल्या महिला पंच ठरल्या आहेत. 52 वर्षीय सलीमा पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (महिला) यांच्यातील टी-20 मालिकेत सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता मुल्तानमध्ये काम करतील. सलीमा यांनी पीसीबी मीडियाला सांगितले – हा फक्त माझा विजय नाही तर पाकिस्तानची प्रत्येक महिला क्रिकेटर आणि अंपायरचा आहे. मला आशा आहे की माझ्या यशामुळे क्रीडा क्षेत्रात आपला ठसा...

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात:संजयकाका पाटील यांची खासदार विशाल पाटलांवर टीका

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे दावे-प्रतिदावे होत आहेत तर कुठे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच सांगली येथील भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात शाब्दिक वार झाल्याचे समोर आले आहे. पद मिळाल्यावर माणसे बेताल होतात, अशी टीका भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यावर केली आहे. तसेच मी माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर पदे मिळवलेली आहेत, असेही त्यांनी म्हणले आहे. संजयकाका पाटील म्हणाले, अलीकडच्या काळात राजकीय जीवनामध्ये माणसाला पद, प्रतिष्ठा मिळाली की माणूस बेफाम होत चालला आहे. मिळालेले पद माझ्या कौशल्यावर, हिंमतीवर मिळवले असा भ्रम तयार होतोय, त्यामुळे माणसे बेताल होत आहेत. पण दिलेले पद लोकांनी कामासाठी दिलेले आहे याचा विसर पडतोय. याचे उदाहरण म्हणजे सांगलीचे नवनियुक्त खासदार आहेत, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी खासदार विशाल पाटील यांनी खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना निवडणुकीत मदत करू, असा शब्द दिला होता. त्यानंतर तासगाव कवठेमहंकाळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या अजितराव घोरपडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर आता त्यांनी याच मतदारसंघातून रोहित पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या सर्व वक्तव्यावरून माजी खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे. काय म्हणाले होते खासदार विशाल पाटील? विशाल पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रूपात आमदार निवडून द्यायचे आहे. रोहित पाटील टेंशन घेऊ नका राजकारण चालू राहत असते. रोहितच्या रूपाने चांगला आमदार देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. वसंतदादा कुटुंब रोहित पाटील यांच्यासोबत कायम उभा राहील. दरम्यान, तासगाव कवठेमहंकाळ मतदारसंघात रोहित पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.  

शहा म्हणाले- नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेसच्या सरकारमध्ये दहशतवाद वाढला:त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये 370 आणायचे आहेत, आम्ही दहशतवाद पाताळात गाडून टाकू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी (16 सप्टेंबर) जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांना येथे तीन सभा संबोधित करायच्या आहेत. नागसेनी येथून त्यांनी सुरुवात केली. खोऱ्यात जेव्हा-जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची सरकारे आली, तेव्हा दहशतवादाला इथे बळ मिळाले, असे ते म्हणाले. दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे की त्यांचे सरकार सत्तेवर आले तर ते कलम 370 पुन्हा लागू करतील. कलम 370 परत करावे का? शहा...