नगरच्या २८० बस कोकणात, रोज ३५० फेऱ्या रद्द:जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

नगरच्या २८० बस कोकणात, रोज ३५० फेऱ्या रद्द:जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर विभागातून २८० एसटीबस ४ सप्टेंबरपासून कोकणात पाठवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे ३५० फेऱ्या रद्द होत आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतूनही बस पाठवल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पहावी लागत आहे. परंतु, एसटी प्रशासनाने १५५ बस रविवारपर्यंत माघारी आल्याचे सांगत, प्रवासी सेवा सुरळीत होत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त शहरी भागातून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून सुमारे ४ हजार बसची व्यवस्था करण्यात आली. त्यात नगर विभागासह, नाशिक, पुणे विभागातून बस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर मार्गांवरील दैनंदिन फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. एकट्या नगर विभागात शुक्रवारी २४ तासांत १ हजार ९०० फेऱ्या नियोजित असतात, त्यापैकी ४०३ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. ४ दिवसांत फेऱ्या रद्द होत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली होती. परंतु, शनिवारपासून काही बस माघारी येत आहेत. सद्यस्थितीत १२५ बस कोकणात थांबवण्यात आल्या आहेत. जादा बसचे नियोजन करता जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. बससेवा सुरळीत होणार नगर विभागातून २८० बस कोकणात पाठवल्या होत्या, त्यापैकी काही गाड्या नगरला परत आल्या . नगरच्या केवळ १२५ गाड्या सद्यस्थितीत कोकणात थांबल्या आहेत. काही फेऱ्या रद्द होत होत्या, बस परत आल्याने प्रवासी सेवा सुरळीत होत आहे. कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नगर.

​गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर विभागातून २८० एसटीबस ४ सप्टेंबरपासून कोकणात पाठवल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे ३५० फेऱ्या रद्द होत आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांतूनही बस पाठवल्यामुळे प्रवाशांना बसची वाट पहावी लागत आहे. परंतु, एसटी प्रशासनाने १५५ बस रविवारपर्यंत माघारी आल्याचे सांगत, प्रवासी सेवा सुरळीत होत असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त शहरी भागातून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यभरातून सुमारे ४ हजार बसची व्यवस्था करण्यात आली. त्यात नगर विभागासह, नाशिक, पुणे विभागातून बस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर मार्गांवरील दैनंदिन फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. एकट्या नगर विभागात शुक्रवारी २४ तासांत १ हजार ९०० फेऱ्या नियोजित असतात, त्यापैकी ४०३ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. ४ दिवसांत फेऱ्या रद्द होत असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय झाली होती. परंतु, शनिवारपासून काही बस माघारी येत आहेत. सद्यस्थितीत १२५ बस कोकणात थांबवण्यात आल्या आहेत. जादा बसचे नियोजन करता जिल्ह्यातील शटल बससेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. बससेवा सुरळीत होणार नगर विभागातून २८० बस कोकणात पाठवल्या होत्या, त्यापैकी काही गाड्या नगरला परत आल्या . नगरच्या केवळ १२५ गाड्या सद्यस्थितीत कोकणात थांबल्या आहेत. काही फेऱ्या रद्द होत होत्या, बस परत आल्याने प्रवासी सेवा सुरळीत होत आहे. कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, नगर.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment