निराधारांचे पैसे, सोयाबीनला भाव द्यावा; बळिराजासाठी काँग्रेसचे धरणे:तहसीलवर धडक, विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करत निषेध‎

वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या, शहरातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत मंगळवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे जमा करावेत. कापसासाठी १० हजार व सोयाबीनसाठी ९ हजार भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, जयसिंग गोहकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निकुरे, अशोक पांडे, अशोक चिकटे, पवन एकरे, साधना गोहोकर, अल्का महाकुलकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये २०१९ नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. इ. मागणीचे निवेदन देण्यात आले. मतदानातूनच उत्तर द्या ^वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या समस्यांवर वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनतेनी मतदानातूनच चोख उत्तर द्यावे. – संजय खाडे, संचालक, कापूस पणन महासंघ.

​वणी विधानसभा क्षेत्रातील समस्या, शहरातील विविध प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत मंगळवारी दि. १५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे जमा करावेत. कापसासाठी १० हजार व सोयाबीनसाठी ९ हजार भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात मोरेश्वर पावडे, प्रमोद वासेकर, जयसिंग गोहकर, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, राजाभाऊ पात्रडकर, प्रमोद निकुरे, अशोक पांडे, अशोक चिकटे, पवन एकरे, साधना गोहोकर, अल्का महाकुलकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना दिवसा १२ तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये २०१९ नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. इ. मागणीचे निवेदन देण्यात आले. मतदानातूनच उत्तर द्या ^वणी विधानसभेतील शेतकरी, कष्टकरी, महीला, युवा यांच्या समस्यांवर वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता जनतेनी मतदानातूनच चोख उत्तर द्यावे. – संजय खाडे, संचालक, कापूस पणन महासंघ.  

Share