मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू

मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू

गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. 7 सप्टेंबरच्या पहाटे मुलुंडमध्ये रस्त्याच्या कडेला बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. गव्हाणपाडा परिसरातील आकृती टॉवरजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात झाला, त्यावेळी प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे स्वयंसेवक ‘मुलुंडचा राजा’ या सुप्रसिद्ध गणेश मंडळाची सजावट करत होते. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस हॉटेलपासून मुलुंड पूर्व-पश्चिम पुलाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यूने मंडपाजवळ उभ्या असलेल्या दोघांनाही धडक दिली. अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी देखील चालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून मुलुंड पश्चिमेकडे निघून गेला. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला आहे. या धडकेत प्रीतम थोरात यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रसाद पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चालक व वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. रहिवासी आणि सहकारी मंडळ सदस्यांनी या घटनेबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले असून, चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळावरून पळून जाण्याऱ्या कारच चालकाला पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. 7 सप्टेंबरच्या पहाटे मुलुंडमध्ये रस्त्याच्या कडेला बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. गव्हाणपाडा परिसरातील आकृती टॉवरजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात झाला, त्यावेळी प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे स्वयंसेवक ‘मुलुंडचा राजा’ या सुप्रसिद्ध गणेश मंडळाची सजावट करत होते. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस हॉटेलपासून मुलुंड पूर्व-पश्चिम पुलाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यूने मंडपाजवळ उभ्या असलेल्या दोघांनाही धडक दिली. अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी देखील चालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून मुलुंड पश्चिमेकडे निघून गेला. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला आहे. या धडकेत प्रीतम थोरात यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रसाद पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चालक व वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. रहिवासी आणि सहकारी मंडळ सदस्यांनी या घटनेबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले असून, चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळावरून पळून जाण्याऱ्या कारच चालकाला पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment