नेहमीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या गुजरातमधील कच्छ-सौराष्ट्र प्रदेशाचे चित्र बदलत आहे. लोकांनी श्रमदान आणि आपापसात देणग्या गोळा करून ३८९ तलाव बांधले आहेत. यामध्ये १५५४ कोटी लिटरपर्यंत पावसाचे पाणी गोळा करता येते. या परिसरातील भूजल पातळी सुधारण्यासाठी तलाव खोदण्याची मोहीम गेल्या १४ वर्षांपासून एका चळवळीसारखी सुरू आहे. या मोहिमेला ‘कच्छ जल मंदिर अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. सामान्य भाषेत स्थानिक लोक या तलावांना ‘जल मंदिर’ म्हणतात. ५०१ जल मंदिरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे पावसाचे पाणी वाळवंटात जाण्यापासून रोखून आकार घेतील. आतापर्यंत ३८९ तलाव बांधण्यासाठी ६.५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. यापैकी २.९३ कोटी रुपये लोकांनी गोळा केले आहेत. उर्वरित पैसे मोहिमेशी संबंधित लोकांनी उचलले आहेत. तथापि, सरकारी पातळीवरही सुजलाम-सुफलामसह तलाव बांधणीच्या अनेक योजना सुरू आहेत. पाणी वाचवण्याची ही चळवळ २०१२-१३ मध्ये सुरू झाली. याअंतर्गत स्थानिक लोक आणि देणगीदारांच्या मदतीने दरवर्षी मार्च ते जुलैदरम्यान एक तलाव तयार केला जातो, जेणेकरून पावसाळ्यात जल मंदिर तयार होईल आणि त्यात पावसाचे पाणी जमा करता येईल. अभियांत्रिकी संस्था या कामासाठी यंत्रे पुरवतात आणि स्थानिक लोक त्यात स्वयंसेवा करतात. वन्य प्राण्यांना पिण्यासाठी तलावही खाेदले जाताहेत लखपत तहसीलमध्ये सर्वाधिक २८ जलमंदिर बांधले, ज्याला पिण्याच्या पाण्याचा ‘स्रोत नाही’ म्हणून घोषित केले. जलमंदिर बांधकामादरम्यान पशुपालनात गुंतलेल्या मालधारी समाजातील लोकांनी ट्रॅक्टरचे भाडे दिले. भुज तहसीलमधील सेदाता, भारापार, सूरजपार, सनोसरा येथे वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी २२ तलाव बांधण्यात आले आहेत.


By
mahahunt
4 August 2025