जैन समाजाच्या आंदोलनामागे राजकीय नेत्याचे पाठबळ:माधुरी हत्तीसाठी आम्ही पण असाच हिंसाचार करायचा का? मनसे नेते अविनाश जाधवांचा सवाल जैन समाजाच्या आंदोलनामागे राजकीय नेत्याचे पाठबळ:माधुरी हत्तीसाठी आम्ही पण असाच हिंसाचार करायचा का? मनसे नेते अविनाश जाधवांचा सवाल

जैन समाजाच्या आंदोलनामागे राजकीय नेत्याचे पाठबळ:माधुरी हत्तीसाठी आम्ही पण असाच हिंसाचार करायचा का? मनसे नेते अविनाश जाधवांचा सवाल

मुंबई येथील दादर परिसरात असलेल्या कबुतर खान्यावरून जैन समाजाकडून आंदोलन करण्यात आले. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कबुतर खाना बंद करण्याच्या निर्णयावरून जैन समाज नाराज आहे. या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनामागे राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याची शंका जाधव यांनी व्यक्त केली आहे. अविनाश जाधव म्हणाले, जैन समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे. जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे. जैन समाज कधीच हिंसाचार मानत नाही, त्यांनी जर असे काही केले असेल तर नक्कीच त्याच्यापाठी राजकीय नेत्याचे पाठबळ असेल. त्यांनी फूस लावल्यामुळे अशी घटना घडली असेल. ज्या पद्धतीने त्यांनी कबुतर खान्याच्या बाबतीत केले, त्या पद्धतीने आम्ही माधुरी हत्तीला आणण्यासाठी करायचे का? असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. आम्ही वनताराला जायचे का? पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, माधुरी हत्तीला आणण्यासाठी आम्ही वनताराला जायचे का? तिथून पण असाच हिंसाचार करून आम्ही तिला सोडवायचे का? असा प्रश्न आमच्या समोर येतो. कबुतरखान्याच्या बाबतीत एक न्याय होणार असेल तर माधुरी हत्ती बाबतीत देखील न्याय होणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. मला अनेक फोन येतात, मेसेज येतात की राज ठाकरे यांनी माधुरी हत्तीबाबत भूमिका घेतली पाहिजे. हे दोन्ही विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाला सांगूनच या दोन्ही विषयांवर मार्ग काढायला पाहिजे असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. तसेच अशा प्रकारचा हिंसाचार जैन समाज करेल अशा प्रकारची अपेक्षा नव्हती, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले. शहराच्या बाहेर एक मोठा कबुतर खाना काढावा पोलिस बघू कशाप्रकारे कारवाई करतात. सरकारने यामध्ये पुढे येऊन माधुरी हत्तीचा विषय असेल किंवा कबुतर खान्याचा विषय असेल. याबाबत सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जावे. या ज्या गोष्टी आहेत त्याकडे सहानुभूतीने पहावे. कबुतरांमुळे दम्याचा आजार होतो अनेक डॉक्टर म्हणतात. शहराच्या बाहेर एक मोठा कबूतर खाना काढावा जिथे लोक वस्ती नसेल अशा ठिकाणी आपला धर्म निभावावा. त्यांच्या समाजातील डॉक्टरांनी समोर यावे आणि म्हणावे की यामुळे आजार होत नाही, असे आवाहन देखील अविनाश जाधव यांनी केले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *