महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू:राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 209, मुंबईत सर्वाधिक 35 कोरोनबाधित

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून राज्यात सध्या 209 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे या चारही रुग्णांना पूर्वीपासूनच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा त्रास होता, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. राजधानी मुंबईतही कोरोनाच्या 35 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण 240 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य प्रशासन सजग झाले असून नागरिकांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका पुन्हा एकदा देशात डोके वर काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार NB.1.8.1 आणि LF.7 हे दोन नवीन व्हेरिएंट्स दिसून येत आहेत. भारत सरकारच्या आरोग्य विभागाने 26 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार सध्या देशभरात 1 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोना साथीच्या दोन मोठ्या लाटा पार पडल्यावर, जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा एकदा या आजाराने झपाट्याने पाय रोवण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. केरळमध्ये सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण केरळमध्ये आहेत. केरळमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 430 वर पोहोचला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 209 सक्रिया कोरोन रुग्ण आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 104 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. तर कर्नाटकात 47 आणि पश्चिम बंगालमध्ये 11 कोरोनाचे सक्रिया रुग्ण आहेत. देशभरात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू देशभरात आतापर्यंत 7 संशयित कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार, केरळमधील दोन तर कर्नाटकमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मात्र या रुग्णांचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाला की अन्य काही कारणांमुळे याची पुष्टी अद्याप आरोग्य विभागाकडून करण्यात आलेली नाही, त्यांच्या मृत्यूचे कारण तपासले जाते आहे. या रुग्णांना इतर काही आजार देखील होते, अशीही माहिती समोर येत आहे. भारतात कोविड-19 चा नवीन प्रकार पसरतोय भारतातील अनेक राज्यांमध्ये नवीन कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, देशात NB.1.8.1 आणि LF.7 हे दोन नवीन प्रकार आढळून आले आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या एजन्सी इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (Insacog) च्या नवीनतम डेटावरून प्राप्त झाली आहे. तथापि, WHO ने त्यांना चिंतेचे प्रकार मानले नाही परंतु त्यांना देखरेखीखाली असलेल्या प्रकारांमध्ये वर्गीकृत केले आहे. चीनसह इतर आशियाई देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रकरणांमध्ये हाच प्रकार दिसून येत आहे. तथापि, A435S, V445H आणि T478I सारख्या NB.1.8.1 चे स्पाइक प्रोटीन उत्परिवर्तन इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरतात. कोविडविरुद्ध विकसित झालेली प्रतिकारशक्ती देखील त्यांच्यावर परिणाम करत नाही. कोविडचा JN.1 प्रकार भारतात सर्वात सामान्य आहे. चाचणी दरम्यान अर्ध्याहून अधिक नमुन्यांमध्ये हा प्रकार आढळतो. यानंतर, BA.2 (२६ टक्के) आणि ओमिक्रॉन सबलाइनेज (२० टक्के) प्रकारांची प्रकरणे देखील आढळतात. JN.1 प्रकार रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो JN.1 हा ओमिक्रॉनच्या BA2.86 चा एक प्रकार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ते पहिल्यांदा दिसले. डिसेंबर 2023 मध्ये, WHO ने ते ‘इंटरेस्ट व्हेरिएंट’ म्हणून घोषित केले. त्यात सुमारे 30 उत्परिवर्तन आहेत, जे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, JN.1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही. जगाच्या अनेक भागांमध्ये हा सर्वात सामान्य प्रकार आहे. JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात.

  

Share