वाराणसीतून पंतप्रधानांचे जनतेला आवाहन:संकल्प करा, स्वदेशी वस्तू घरी आणा- मोदी

आपण मेक इन इंडिया उत्पादनांनाच प्रोत्साहन देऊ. आपल्या घरात ज्या नवीन वस्तू येतील त्या केवळ स्वदेशी असतील, असा संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासीयांना केले. प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जेव्हा आपण आर्थिक प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा मी तुमचे लक्ष सध्याच्या जागतिक परिस्थितीकडेही वेधू इच्छितो. जगातील इतर देश त्यांच्या स्वतःच्या हितांवर लक्ष केंद्रित करत आहेत. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. म्हणून, भारतालाही आपल्या आर्थिक हितांबद्दल जागरूक राहावे लागेल. भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने २५% कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर, लोकांना जागरूक ग्राहक बनण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जेव्हा आपण काही खरेदी करतो तेव्हा आपण स्वतःला विचारले पाहिजे – ते बनवण्यासाठी एखाद्या भारतीयाने कठोर परिश्रम घेतले आहेत का? जर ते आपल्या लोकांच्या घामाने आणि त्यांच्या कौशल्याने बनवले असेल, तर ते उत्पादन आपल्यासाठी स्वदेशी आहे. आपण ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र स्वीकारला पाहिजे. पंतप्रधानांनी लोकांना सर्व नवीन खरेदी मेड इन इंडिया असल्याची खात्री करण्यास प्रोत्साहित केले.
पंतप्रधान म्हणाले की, आपले शेतकरी, आपले लघु उद्योग, तरुणांचा रोजगार, त्यांचे हित आपल्यासाठी सर्वोपरि आहे. सरकार या दिशेने प्रयत्न करत आहे. परंतु, देशाचे नागरिक म्हणून, आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत. स्थानिक उत्पादनांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय चळवळीचे आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले की, हे फक्त मोदींचे म्हणणे नाही, प्रत्येक भारतीयाने हे सांगितले पाहिजे. जर आपल्याला भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर प्रत्येक पक्ष व प्रत्येक नेत्याने संकोच बाजूला ठेवून राष्ट्रीय हितासाठी काम केले पाहिजे व लोकांमध्ये स्वदेशीची भावना जागृत केली पाहिजे.
आपली अर्थव्यवस्था ही अश्वमेधाचा घोडा, जगात कोणीही ते थांबवू शकत नाही: शिवराज पाटणा | केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी म्हणाले, आज आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. तिसरी होऊ. आपली अर्थव्यवस्था अश्वमेधाचा घोडा आहे, जगातील कोणतीही शक्ती ते थांबवू शकत नाही. शिवराज यांनी किसान संवाद कार्यक्रमात सांगितले की, बहिणींनी प्रतिज्ञा करावी की त्या फक्त आपल्या भावांच्या मनगटावर देशात बनवलेल्या राख्या बांधतील.
पंकज बन्सल, एचआर टेक कंपनी पीपल स्ट्राँगचे संस्थापक धोरण पातळीवर काय करण्याची गरज? सरकारने काय करावे?
•अमेरिकेचा दृष्टिकोन बदलत आहे. शेजारील देशांशी संबंध तणावपूर्ण आहेत. याला तोंड देण्यासाठी सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागेल, कारण मृदू भूमिकमुळे जगासमोर वारंवार झुकावे लागेल.
कंपन्यांनी काय करावे?
उत्पादन क्षेत्राला एका नवीन पातळीवर न्यावे लागेल. सरकारने भांडवली मदत पुरवावी आणि उद्योगांनी कामगारांना प्रशिक्षण द्यावे. भारताने आधार, यूपीआय आणि कर्मयोगी भारत सारखे जागतिक दर्जाचे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केले आहेत. जरी अमेरिका आणि चीन एआय सारख्या मोठ्या तंत्रज्ञानावर वर्चस्व गाजवत असले तरी, भारतीय कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मचा फायदा घेत नवीन उत्पादने विकसित करावीत.
सामान्य लोकांनी काय करावे
भारतातील उत्पादनांवर विश्वास वाढवावा लागेल. आज प्रत्येक गोष्टीसाठी स्वदेशी पर्याय नसतील, परंतु जर ग्राहकांनी मागणी केली तर कंपन्याही प्रेरित होतील.
चीनकडून धडा घ्या
असंघटित क्षेत्राला संघटित करावे लागेल. लहान विभागांचे संघटित करून चीनने उत्पादनात वर्चस्व मिळवले. देशात २० कोटी लोक संघटित व्यवस्थेत नाहीत. आपण त्यांना व्यवस्थेत आणले तर आपण अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *